शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जत तालुक्याला दोन हजार कोटींच्या सिंचन योजनेचे ‘पाणी’; म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या विस्तारीकरणाला मान्यता

By योगेश पांडे | Updated: December 18, 2022 22:23 IST

जत तालुक्याचा उल्लेख कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर राज्यात वादळ उठले व केंद्राला त्यात मध्यस्थी करावी लागली. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तेथील नेमक्या प्रश्नांची माहिती घेतली. जत तालुक्यातील ५० हून अधिक गावांमध्ये पाण्याची भीषण समस्या आहे.

नागपूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील जत तालुक्यामुळे राज्याचे राजकारण तापले असता राज्य शासनाने तेथील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या विस्तारीकरणाला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच रविवारी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.

जत तालुक्याचा उल्लेख कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर राज्यात वादळ उठले व केंद्राला त्यात मध्यस्थी करावी लागली. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तेथील नेमक्या प्रश्नांची माहिती घेतली. जत तालुक्यातील ५० हून अधिक गावांमध्ये पाण्याची भीषण समस्या आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी गावांपर्यंत पोहोचलेच नाही. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. त्यासाठी दोन हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्यात आला व त्याला मान्यता मिळाली. यामुळे ४८ गावांना पाणीपुरवठा होऊ शकणार आहे.

युद्धस्तरावर योजना राबविण्याचे निर्देशजत तालुक्यातील गावांसाठी महत्त्वाची विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावे. उपसा सिंचन योजना आणि गावागावातील पाणी पुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने कार्यवाही करावी. या कामांसाठी आवश्यक निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. एकीकडे तांत्रिक बाबी, आराखडे तसे इतर बाबी पूर्ण करण्यावर भर द्यावा. विस्तारित योजनेतून पाणी मिळवण्याचा टप्पा तसेच वितरण जाळे यांचे काम यांचा ताळमेळ साधला जाईल यासाठी नियोजन करण्याच्या सूचनादेखील त्यांनी दिल्या. 

टॅग्स :nagpurनागपूरborder disputeसीमा वादKarnatakकर्नाटकMaharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदेWaterपाणी