शहरं
Join us  
Trending Stories
1
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
2
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
3
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
4
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
5
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
6
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
7
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
8
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
9
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
10
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
11
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
12
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
13
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
15
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
16
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
17
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
18
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
19
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
20
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?

आम्ही कर्तव्य पार पाडतोच

By admin | Published: February 21, 2017 2:25 AM

आयुष्याची सत्तरी ओलांडणाऱ्या नागरिकांसाठी निवडणुकीचा अनुभव काही नवा नाही.

मतदान न करणाऱ्यांनी जाब विचारू नये : ज्येष्ठांनी दिला विचारनागपूर : आयुष्याची सत्तरी ओलांडणाऱ्या नागरिकांसाठी निवडणुकीचा अनुभव काही नवा नाही. अनेक उन्हाळे-पावसाळे पाहण्यासारखाच अनुभव या ज्येष्ठांना निवडणुकांचा आहे. देशात बदलणारी परिस्थिती त्यांनी पाहिली आहे. त्या बदलाचे स्मरण आणि जाणीवही त्यांना आहे. त्यामुळे निवडणुकीचा तसा उत्साह नसला तरी मतदान करण्याची आवश्यकता त्यांना माहिती आहे. त्यामुळे होऊ घातलेली महानगरपालिकेची निवडणूक त्यांना महत्त्वाची वाटते. आयुष्याची सायंकाळ चांगली जावी ही माफक अपेक्षा ज्येष्ठ नागरिकांची असते. वार्धक्याच्या काळात शहरातील वातावरण आरोग्यदायी राहावे, महानगरपालिकेशी जुळलेली लहान-मोठी कामे करता यावी एवढीच त्यांची इच्छा. हे करण्यासाठी आपला प्रतिनिधी चांगला असावा व प्रश्न सोडविण्यासाठी तो सक्षम असावा याची जाणीव त्यांना अनुभवातून मिळाली आहे. त्यामुळेच की काय संवैधानिक अधिकाराप्रति आणि सोबत आलेल्या कर्तव्याची त्यांना जाणीव आहे. लोकमतने या ज्येष्ठांशी साधलेला हा संवाद. (प्रतिनिधी)मतदान आमचा अधिकार आहेवयाची सत्तरी पार केली असल्याने अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिल्यासारखा अनेक निवडणुकांचाही अनुभव आहे. कधी चांगला तर कधी वाईट. मनासारखे चित्र दिसत नसल्याने अनेक वेळा निराशाही होते. मात्र मतदान आमचा अधिकार आहे आणि तो निभावणे आमचे कर्तव्यही आहे. वारंवार मिळणारी ही संधी शेवटच्या क्षणापर्यंत निभावण्याची इच्छा आहे. - सुदर्शन सुभेदारप्रत्येकाने कर्तव्य बजावले पाहिजेमतदान न करता व्यवस्था वाईट आहे, असे बोलणे योग्य नाही. कधी आपल्या मनासारखे होतेच, असे नाही. मात्र प्रत्येकाने आपले कर्तव्य बजावण्याची गरज आहे. काही सकारात्मक बदल घडविण्याची इच्छा असेल तर मतदान हे केलेच पाहिजे. स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून अनेक निवडणुका अनुभवल्या आहेत. लोकसभा, विधानसभा असो की महापालिका, प्रत्येक निवडणूक महत्त्वाची असते. - द.शा. पंडेआपण चुकायचे नाहीआपण मतदान करतो व अनेक वेळा आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही. निवडून गेलेला उमेदवार आपल्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, याची जाणीव होते आणि एवढ्या वर्षांच्या अनुभवात ती अनेक वेळा झालीही आहे. निवडणूक कोणतीही असो, न चुकता मतदान करायचे ठरविले आहे.- माधुरी ठोसरचांगले घडेल, या अपेक्षेतून मतदानअनेक वर्षांचे अनुभव सारखेच आहेत, मात्र उत्साह आजही वाटते. परिस्थिती मात्र बदलली आहे. आपल्या मनासारखे होईलच असे नाही. मात्र निवडूना येणारा उमेदवार आपल्या समस्या सोडवेल, ही अपेक्षा कायम असते. त्यामुळेच आवर्जून मतदान करावे, असे वाटते. हे आमचे शहर आहे. त्यामुळे आमच्या एका मताने चांगले होत असेल तर ही संधी आम्ही का सोडावी. - संध्या ठोसर मतदान न करणाऱ्यांनी जाब विचारू नयेजे लोक मतदान करणार नाही त्यांना अमूक काम झाले नाही, असा जाब विचारण्याचाही अधिकार नाही. मतदान हा संविधानाने दिलेला मूलभूत अधिकार आहे आणि लोकशाही जिवंत असण्याचे प्रतीक आहे. यातूनच आम्हाला आमचा प्रतिनिधी निवडायचा आहे. बदल हा घडणारच. मात्र तो घडविण्याची जबाबदारी आमची आहे. - शरद देवपुजारी उत्साहापेक्षा कर्तव्याची जाणीवमाझे वय ८० वर्षांच्यावर आहे. पक्षाची कामेही केली आहेत. त्यामुळे तरुणांसारखा उत्साह नसला तरी कर्तव्याची जाणीव मात्र आहे. आज परिस्थिती बदलली आहे. वार्धक्याच्या काळात शहरातील वातावरण आरोग्यदायी राहावे यासाठी योग्य माणसे सभागृहात पोहोचावी, ही अपेक्षा नेहमीच असते. या अपेक्षेतूनच न चुकता मतदान करण्याची इच्छा असते.- मधुकर रोटकर