शहरं
Join us  
Trending Stories
1
लढायचं की पाडायचं? मनोज जरांगेंनी २० तारखेला बोलावली अंतिम बैठक
2
ठाकरेंवर टीका करून पक्ष सोडला होता; आता ८ महिन्यात शिंदेसेनेलाही रामराम केला, कारण...
3
Maharashtra Assembly Election 2024 : 'एक महिन्यापासून अजितदादांसोबत बोललो नाही'; राजेंद्र शिंगणे मोठा निर्णय घेणार? दिले स्पष्ट संकेत
4
ICC कडून डिव्हिलियर्सला 'हॉल ऑफ फेम'; विराटचे मित्रासाठी लांबलचक पत्र, आठवणी अन्...
5
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर अरबाज खानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "कुटुंबात खूप काही..."
6
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
7
'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले- "माझी पत्नी जयश्री..."
8
"...तर समाजवादी पार्टी स्वबळावर निवडणूक लढवणार", अबू आझमींचा महाविकास आघाडीला इशारा
9
3 दिवसांत 12 भारतीय विमानांना बॉम्बच्या धमक्या; आता गृहमंत्रालय करणार कडक कारवाई...
10
'मशाली'सारखा 'तुतारी'ला फटका; काँग्रेसच्या सांगली पॅटर्नची विदर्भात पुनरावृत्ती? 
11
राष्ट्रवादीतून मोठी आऊटगोईंग?; प्रश्न विचारताच अजित पवार भडकले, खंबीर असल्याचं सांगत म्हणाले...
12
मुख्यमंत्री शिंदेंनी ‘रिपोर्टकार्ड’वर नव्हे तर ‘रेट कार्ड’वर बोलावे; नाना पटोलेंचे टीकास्त्र
13
महाराष्ट्रात कोण असेल महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा? देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
14
“आम्ही ठरवले आहे की पुन्हा सत्तेत आल्यास बहि‍णींना ३ हजार देणार”; शिंदे गटातील नेत्याचा शब्द
15
10 पत्नी, ६ गर्लफ्रेंड, जग्वार अन् विमानातून प्रवास; शौकीन चोराची चक्रावून टाकणारी गोष्ट!
16
दुसऱ्यांदा विमान बॉम्बने उडवण्याची धमकी, अकासा एअरच्या प्लेनचे दिल्लीत इमर्जन्सी लँडिंग
17
२ तास ३५ मिनिटं घाबरवलं; डिजिटल अरेस्ट करून वृद्धाला २८ लाखांचा गंडा, एक कॉल अन्...
18
जम्मू काश्मीरमध्ये बिघडला 'इंडिया' आघाडीचा खेळ; सत्तास्थापनेत काँग्रेस बाहेर
19
UPI पेमेंट सर्व्हिस लवकरच ५० नवीन ॲप्सवर मिळणार, NPCI कडून मोठी घोषणा
20
भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कोच आता मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात, अखेर घरवापसी झाली

‘आम्ही संघ भूमीत भाजप साफ केली, तुम्ही कर्नाटकात करा’; विदर्भातील काँग्रेस नेत्यांची तोफ कर्नाटक प्रचारात धडाडतेय

By कमलेश वानखेडे | Published: May 06, 2023 5:31 PM

Nagpur News विदर्भात भाजपला जनाधार उरलेला नाही. त्यामुळे आता कर्नाटकात तुम्हीही धाडस करा. ताकदीने मतदान करा व भाजपला हद्दपार करा, अशी विदर्भातील काँग्रेस नेत्यांची तोफ कर्नाटक निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात धडाडत आहे.

कमलेश वानखेडे

नागपूर : संघ भूमी असलेल्या नागपुरातच भाजपचा सुपडा साफ झाला आहे. देशभरात नागपूरला भाजपचा गड सागणाऱ्यांचा गड काँग्रेसने नागपूर पदवीधर, नागपूर शिक्षक व अमरावती पदवीधर अशा विधान परिषदेच्या तीन जागा जिंकून उद्ध्वस्त केला आहे. विदर्भात भाजपला जनाधार उरलेला नाही. त्यामुळे आता कर्नाटकात तुम्हीही धाडस करा. ताकदीने मतदान करा व भाजपला हद्दपार करा, अशी विदर्भातील काँग्रेस नेत्यांची तोफ कर्नाटक निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात धडाडत आहे.

कर्नाटकमध्ये १० मे रोजी मतदान होत असून, १३ मे रोजी निकाल आहे. या निवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसने विदर्भातील ज्येष्ठ नेत्यांवर विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविली आहे. माजी मंत्री

नितीन राऊत, सुनील केदार, विजय वडेट्टीवार, वसंत पुरके, आ. विकास ठाकरे, प्रवक्ते अतुल लोंढे हे प्रचारासाठी कर्नाटकात तळ ठोकून आहेत. गावोगावी फिरून प्रचार सभा घेत असून, तेथे नागपूरसह विदर्भात भाजपचे कसे पानिपत झाले आहे, हे कर्नाटकातील जनतेसमोर मांडत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेसप्रणीत आघाडीचे सरकार येणार असल्याचा दावा करीत तुम्ही कर्नाटकात सरकार आणा, असे आवाहनही हे नेते मतदारांना करीत आहेत.

एवढेच नव्हे तर कोरोना काळातही महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला. त्यामुळे कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आले तर येथेही शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास तेथील शेतकऱ्यांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

 

प्रचारात ‘खोके अन् बोके’

- महाराष्ट्रातील सत्तांतर कर्नाटकच्या निवडणुकीत चांगलेच चर्चेत आहे. विदर्भातील काँग्रेस नेते खोके देऊन महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले व बोके सत्तेवर बसले, असा मुद्दा ठासून मांडत आहे. कर्नाटकात अशी खोके देऊन सरकार बनविण्याचा दूषित हेतू साध्य होऊ नये म्हणून एकतर्फी बहुमत द्या, असे भावनिक साकडे विदर्भातील काँग्रेस नेते कर्नाटकातील जनतेला घालत आहेत.

अशी आहे नेत्यांची जबाबदारी - उमेदवारांची यंत्रणा योग्यरित्या काम करीत आहे का, ते तपासणे, त्याला कुठे त्रास होत आहे याची माहिती घेणे.

- तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेले नेते काम करीत आहेत का ते पाहणे व दिल्लीतील नेत्यांशी त्यांची भेट घालून देत त्यांना पक्षाच्या कामी लावणे.

- समज दिल्यानंतरही स्थानिक नेते विरोधात काम करीत असतील तर त्यांचा अहवाल हायकमांडला सादर करणे.

- बूथ स्तरावरील पक्षाची यंत्रणा कशी कार्यरत आहे याची पडताळणी करणे.

- मतदारसंघातील प्रमुख नेत्यांच्या व विविध समाजातील प्रमुख लोकांच्या भेटी घेणे.

टॅग्स :BJPभाजपा