शहरं
Join us  
Trending Stories
1
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
2
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
3
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
4
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
5
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
6
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
7
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
8
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
9
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
10
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
11
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
12
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
13
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
14
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
15
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
16
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
17
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
18
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
19
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप

सरकार आणि जरांगे पाटील यांचे काय ठरले ते अधिवेशनात विचारू, विजय वडेट्टीवार यांचा इशारा

By कमलेश वानखेडे | Published: November 23, 2023 4:04 PM

सत्तेचा मलिदा खाण्यात हे सरकार व्यस्त

नागपूर : आमचा मराठा आरक्षणाला विरोध नसून केवळ ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू नये ही मागणी कायम आहे. सरकारचं आणि जरांगे पाटील यांचे काय ठरले ते अधिवेशनात विचारू. तुमचं गुपचूप काय ठरलं, आतून ठरलं की बाहेरून ठरलं, ते विचारू असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी नागपुरात दिला.

वडेट्टीवार म्हणाले, राज्यात शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. शेतकऱ्यांच्या वेदना जाणवायला या सरकारला वेळच नाही. सत्तेचा मलिदा खाण्यात हे सरकार व्यस्त आहे. राज्याला दुष्काळ घोषित करण्याची मागणी करत होतो. पण एसडीआरएफ आणि एनडीआरएफची निकषानुसार केंद्र सरकार मदत करते त्या विभागाची बैठकसुद्धा मंत्र्यांनी घेतली नाही. केवढं तोंड बघून ४० तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात आला. नंतर घोषित झाल्या एक हजार मंडळांना केंद्र सरकार मदत करू शकत नाही. राज्य सरकारने हात वर केलेले आहे. या स्थितीत शेतकरी जगणार कसा, असा सवाल त्यांनी केला.

मराठवाड्यात धरणात पाण्याचा साठा केवळ ३६ टक्के शिल्लक आहे. अजून सात महिने काढायचे आहेत. पिण्याचे पाणी नाही, शेती पिकत नाही. या स्थितीत शेतकऱ्यांनी किडनी विकायची वेळ आली. सरकारने या राज्यातील शेतकरी कर्जमुक्त केला पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

टॅग्स :PoliticsराजकारणVijay Vadettiwarविजय वडेट्टीवारcongressकाँग्रेसreservationआरक्षणMaratha Reservationमराठा आरक्षणOBC Reservationओबीसी आरक्षणFarmerशेतकरीWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलState Governmentराज्य सरकार