शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

सहकाराच्या माध्यमातून ‘वेस्ट टू वेल्थ’ शक्य

By admin | Published: February 29, 2016 2:55 AM

टाकाऊ वस्तूंपासून उत्पन्न घेणे म्हणजे ‘वेस्ट टू वेल्थ’ ही संकल्पना सहकारच्या माध्यमातून पुढे नेणे शक्य आहे,...

नितीन गडकरींचे यांचे प्रतिपादन : सहकार भारतीच्या अधिवेशनाचा समारोपनागपूर : टाकाऊ वस्तूंपासून उत्पन्न घेणे म्हणजे ‘वेस्ट टू वेल्थ’ ही संकल्पना सहकारच्या माध्यमातून पुढे नेणे शक्य आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.सहकारी भारतीच्या विदर्भ शाखेतर्फे रेशीमबागेतील डॉ. हेडगेवार स्मृती सभागृह येथे आयोजित दोन दिवशीय अधिवेशनाचा रविवारी सायंकाळी समारोप झाला. त्यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. व्यासपीठावर संघटनेचे राष्ट्रीय संरक्षक सतीश मराठे व विदर्भ शाखेचे अध्यक्ष केशव दांडेकर उपस्थित होते. गडकरी यांनी अनेक उदाहरणे देऊन ‘वेस्ट टू वेल्थ’चे महत्त्व पटवून सांगितले. केसांपासून शेती उपयोगी अ‍ॅमिनो अ‍ॅसिड तर, शौचालयाच्या पाण्यापासून सीएनजी वायू तयार करता येत असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांनी गाईचे महत्त्वही समजावून सांगितले. गोमूत्र प्राशन केल्यामुळे तब्येत ठणठणीत राहते. गाईच्या तुपाला मोठी मागणी आहे. देशी गाई पाळण्याचे प्रमाण वाढले पाहिजे. राजस्थानातील साहिवाल व गीर या गाईपासून जन्मलेल्या बैलाचे वीर्य वापरून महाराष्ट्रातील देशी गाई दुधाळू करता येऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.रामदेवबाबा गडचिरोली, अमरावती व नागपूर येथे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करणार आहेत. शेतकऱ्यांना चांगले उत्पादन व्हावे व त्यांनी आत्महत्या करू नये यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा योजना राबविली जात आहे. तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवून अधिकाधिक रोजगार निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू आहे, याकडेही गडकरी यांनी लक्ष वेधले.