शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
5
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
6
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
7
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
8
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
9
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
10
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
11
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
12
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
13
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
14
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
15
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
16
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
17
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
18
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
19
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
20
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु

फेलोशीपच्या ‘हायपॉवर कमिटी’चे काय झाले? पीएच.डी. पात्रताधारकांचा सवाल 

By निशांत वानखेडे | Published: March 10, 2024 6:44 PM

दाेन महिन्यानंतरही कमिटीकडून काेणताच अहवाल न आल्याने कमिटीचे काय झाले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

नागपूर: बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून पीएच.डी. फेलोशिपसाठी घेण्यात आलेल्या पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याच्या घटनेला आता दाेन महिन्याचा कालावधी लोटला आहे. परीक्षा रद्द करून याबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने हायपाॅवर कमिटी स्थापन केली हाेती. मात्र दाेन महिन्यानंतरही कमिटीकडून काेणताच अहवाल न आल्याने कमिटीचे काय झाले, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

फेलाेशीपसाठी एससी, एसटी, ओबीसी विद्यार्थ्यांचे रणकंदन अजुनही सुरुच आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर यासाठी तिन्ही संघटनेच्या विद्यार्थ्यांकडून आंदाेलन चालले आहे. मात्र सरकारकडून याबाबत काहीच हालचाली हाेत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड राेष तयार हाेत आहे. फेलाेशीप पात्रतेसाठी १० जानेवारी २०२४ राेजी परीक्षा घेण्यात आली हाेती. राज्यातील ४ केंद्रांपैकी नागपुरातील कमला नेहरू महाविद्यालयात ही परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, या परीक्षा केंद्रांवर महाज्योती पीएचडी फेलोशिप परीक्षेचा पेपर पुन्हा फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या चार सेट पैकी २ सेट हे लीक असून ते झेरॉक्स कॉपी असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. ए आणि बी सेट हे सीलबंद हाेते, तर उर्वरित सी आणि डी हे लीक हाेते. शिवाय त्यांना स्टेपलर केलेल्या पिन आढळून आल्या. त्यामुळे पेपरफुटीवर आक्षेप घेत विद्यार्थ्यांनी परीक्षेवर बहिष्कार टाकला.

विशेष म्हणजे महाज्याेतीने यापूर्वी निर्धारीत केलेली परीक्षासुद्धा रद्द करण्यात आली हाेती. अशा प्रकारामुळे महाज्याेतीच्या भाेंगळ कारभाराबाबत विद्यार्थ्यांमध्ये तीव्र राेष पसरला आहे. धक्कादायक म्हणजे बार्टीचे पीएचडी पात्रताधारक २०२२ पासून आणि सारथी व महाज्याेतीचे पात्रताधारक २०२३ पासून फेलाेशीप मिळण्याची प्रतीक्षा करीत आहेत. सरकारने हायपाॅवर कमिटी स्थापन केली पण दाेन महिने लाेटूनही या कमिटीचा अहवाल आला नाही की सरकारकडून कुठला निर्णय हाेत नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत सरकारकडून काहीच हालचाली हाेत नसल्याने विद्यार्थी हवालदिल झाले आहेत.

अशात लवकरच लाेकसभेच्या व त्यानंतर राज्याच्या निवडणुका ताेंडावर येऊ घातल्या आहेत. लाेकसभेच्या निवडणुकीसाठी आचार संहिता लागली की या विषयावर पुन्हा तीन महिने कुठलाही निर्णय हाेण्याची शक्यता नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची चिंता अधिकच वाढत चालली आहे.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नाहीविद्यार्थ्यांसोबत खेळ खेळला जात आहे. शासन जर वारंवार अशा चुका करीत असून ते किती गंभीर आहेत हे लक्षात येतं. शासनाने पात्रता परीक्षेचा ससेमिरा थांबवून सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप द्यावी, अशी आग्रही मागणी आता विद्यार्थ्यांच्या वतीने केली जात आहे.

टॅग्स :nagpurनागपूर