शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

दुर्गंधी पसरणार नाही तर काय? २५० मेट्रिक टन कचरा रोज पडूनच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 12:30 IST

शहरालगतच्या परिसरात ढिगारे : फ्लॅटमधील कचरा उचलणार कोण?

नागपूर : नागपूर शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी बीव्हीजी व एजी एन्व्हायरो या दोन कंपन्यांकडे आहे. शहरातून दररोज ११०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो. परंतु, यातील जवळपास २५० मेट्रिक टन कचरा उचललाच जात नाही. शहराच्या विविध भागात हा कचरा तसाच पडून राहतो. प्रामुख्याने शहरालगतच्या परिसरात फेरफटका मारला तर जागोजागी कचरा साचलेला दिसतो. कंपन्यांचे कचरा संकलन कोलमडल्याचे चित्र आहे.

शहराच्या सर्व भागातील कचरा उचलला जावा, या हेतूने बीव्हीजी व एजी एन्व्हायरो या दोन कंपन्यांकडे प्रत्येकी पाच झोनमधील कचरा उचलण्याची जबाबदारी सोपविली आहे. मात्र, यापेक्षा महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे ही जबाबदारी ठेवून मनुष्यबळ उपलब्ध केले असते तर शहरातील कचऱ्याची समस्या निकाली निघाली असती. परंतु, खासगी कंत्राटदारांकडे जबाबदारी असल्याने समस्या कायम आहे. दुसरीकडे वजन वाढविण्यासाठी कचऱ्यात माती आणि सिमेंटयुक्त रेतीची भेसळ केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. गतकाळात हा प्रकार उघडकीस आला होता. कंपनीवर कारवाईसुद्धा झाली होती. परंतु, अजूनही हा प्रकार थांबलेला नाही.

क्यू आर कोडचा प्रकल्प बारगळला

घरातील कचरा उचलला की नाही याची इत्यंभूत माहिती क्यू आर कोडच्या माध्यमातून मिळणार होती. दोन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून तेलंगखेडी येथे प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. परंतु, हा प्रकल्प काही दिवसांतच बारगळला आहे. नागरिकांच्या घरांवर लावलेल्या कोडच्या स्टिकरवरून कचरा उचलला की नाही याची माहिती मनपा प्रशासनाला मिळणार होती.

फ्लॅटमधील कचरा कोण उचलणार?

कंपन्याकडून शहरातील फ्लॅट स्किममधील कचरा उचलला जात नाही. यामुळे कचरा तसाच पडून राहतो. काही फ्लॅटधारक कचरा रस्त्यांवर आणून टाकतात. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आले आहे. याला कंपन्याच जबाबदार असल्याची नागरिकांची तक्रार आहे.

दोन कोटींच्या डस्टबिन चोरीला

स्वच्छ शहरासाठी महापालिकेकडून विविध उपक्रमांसोबतच प्रकल्पही राबविण्यात येतात. शहरातील प्रमुख रस्त्यावर दोन कोटी खर्च करून ४०० डस्टबिन लावण्यात आल्या होत्या. परंतु, सद्य:स्थितीत या डस्टबिनची दुरवस्था झाली आहे. यातील कचरा उचलला जात नाही, तर काही ठिकाणच्या डस्टबिन चोरीला गेलेल्या आहेत.

ओला-सुका कचरा एकत्रच

कंपन्यांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित करणे आवश्यक आहे. परंतु, अजूनही ६० टक्के कचरा एकत्रच गोळा केला जातो. परिणामी संकलन केंद्रावर ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करताना अडचणी येतात.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका