शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा फोटो समोर, ओळखही पटली, दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक
3
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी सर्वात कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
5
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
8
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
9
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
10
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
11
सोन्याच्या दरात २७०० रुपयांची मोठी घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर
12
"तिथून परत आलेच नसते तर...", काश्मीरला फिरायला गेलेली मराठी अभिनेत्री, दहशतवादी हल्ल्यानंतर केली पोस्ट
13
अजित पवारांनीही केला ओमर अब्दुल्लांना फोन; पर्यटकांच्या सुटकेबाबत काय म्हणाले?
14
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!
15
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत मोठा खुलासा! दहशतवाद्यांनी १ ते ७ एप्रिल दरम्यान रेकी केली, नंतर हल्ला केला
16
Pahalgam Attack Update : वाढदिवसानिमित्त काश्मीर ट्रिप...; दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलांसमोरच केली शैलेशची हत्या
17
यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक
18
IPL 2025: भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध! ना फटाके, ना चीअरलीडर्स; खेळाडू, पंच बांधणार काळ्या फिती
19
चैत्र वरुथिनी एकादशी: ‘असे’ करा व्रताचरण, श्रीविष्णू शुभच करतील; पाहा, महत्त्व अन् मान्यता
20
पत्नीसोबत काश्मीरला गेले अन् तो व्हिडीओ ठरला शेवटचा! दहशतवाद्यांनी हत्या करण्यापूर्वीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

जे उद्धव ठाकरेंच्या मालकीचेच नाही ते आंबेडकरांना कसे देणार ?

By कमलेश वानखेडे | Updated: May 28, 2023 08:00 IST

Nagpur News अकोला लोकसभेत गेल्या चार टर्मपासून भाजपचे खासदार संजय धोत्रे हे विजयी झेंडा रोवत आहेत. आघाडीत ही जागा काँग्रेस लढत आली आहे. आता उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती जाहीर केली.

 

 

नागपूर : अकोला लोकसभेत गेल्या चार टर्मपासून भाजपचे खासदार संजय धोत्रे हे विजयी झेंडा रोवत आहेत. आघाडीत ही जागा काँग्रेस लढत आली आहे. आता उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्याशी युती जाहीर केली. पण ॲड. आंबेडकर अद्याप महाविकास आघाडीत दाखल झालेले नाहीत. त्यामुळे काँग्रेससह राष्ट्रवादी ही जागा आंबेडकरांसाठी सोडण्यास इच्छुक नाही. एकूणच परिस्थिती पाहता जे उद्धव ठाकरेंच्या मालकीचेच नाही ते आंबेडकरांना कसे देणार, असा पेच निर्माण झाला आहे.

अकोला मतदारसंघात नेहमी भाजप, काँग्रेस व भारिप बमसं (सध्याची वंचित बहुजन आघाडी) अशीच तिहेरी लढत होते. कधी काँग्रेस तर कधी वंचित बहुजन आघाडी आलटून पालटून दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. आघाडीमध्ये ही जागा काँग्रेस लढत आली. गेल्या चार दशकांपासून येथे काँग्रेसचा होत असलेला पराभव याचे भांडवल करीत शिवसेना या जागेवर दावा करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी ॲड. आंबेडकर यांच्याशी मैत्रीचा हात मिळविला आहे. पण सत्तासंघर्षातील निकालानंतर अकोल्यातील पत्रकार परिषदेत त्यांना आघाडीतील प्रवेशासंदर्भात छेडले असता, मी शिवसेना ठाकरे गटाचा मित्र आहे, महाविकास आघाडीत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. आंबेडकर हे महाविकास आघाडीकडे स्वत: अकोल्याची जागा मागणे टाळत आहेत. पण त्यांच्यावतीने ही जबाबदारी पार पाडण्यासाठी उद्धव ठाकरे कामाला लागले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांत प्राथमिक चर्चाही आटोपली आहे. ॲड. आंबेडकरांना महाविकास आघाडीत थेट जागा मिळाली नाही तर ती आपल्या कोट्यात घेऊन आंबेडकरांना लढविण्याची शिवसेनेची तयारी आहे. हा पेच सोडविण्यात यश आले व काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची व्होट बँक एकत्र आली तर भाजपला तगडी फाइट दिली जाऊ शकते.

सुरुवातीची दहा टर्म काँग्रेसकडे असलेली अकोल्याची जागा १९८९ मध्ये हिसकावण्यात भाजपचे पांडुरंग फुंडकर यांना यश आले होते. फुंडकर तीन टर्म विजयी झाल्यानंतर १९९८ व १९९९ या दोन्ही निवडणुकीत ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी भाजपकडून ही जागा खेचली होती. यापैकी ९८ च्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे शरद पवार यांच्या पुढाकाराने धर्मनिरपेक्ष मतांची मोट बांधली गेली होती. ॲड. आंबेडकर (रा. गवई, अमरावती), प्रा. जोगेंद्र कवाडे (चिमूर) व रामदास आठवले (मुंबई उत्तर मध्य) हे आंबेडकरी नेते खुल्या मतदारसंघातून विजयी झाले होते. आता भाजपविरोधी आघाडी उभी करण्याचे तसेच प्रयत्न सुरू असताना महाराष्ट्राच्या नजरा अकोल्याकडे असतील.

 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSanjay Dhotreसंजय धोत्रे