शहरं
Join us  
Trending Stories
1
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
2
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
3
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
4
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
5
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
6
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
7
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
8
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
9
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
10
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
11
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
12
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
13
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
14
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
15
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
16
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
17
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
18
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
19
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
20
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा

खरीप पिकांची ‘एमएसपी’ जाहीर करणार कधी? ‘सीएसीपी’ची प्रक्रिया ३१ मार्चपूर्वीच पूर्ण

By सुनील चरपे | Published: May 29, 2023 11:13 AM

नियाेजनाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

सुनील चरपे

नागपूर : खरीप पिकांची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) ही दरवर्षी एप्रिलच्या शेवटी अथवा मेच्या सुरुवातीला जाहीर हाेणे अपेक्षित असताना केंद्र सरकार चालू खरीप हंगामाचे एमएसपी दर जाहीर करण्यात दीर्घ दिरंगाई करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप पिकांचे नियाेजन करण्यात अडचणी येत असल्याने एमएसपी नेमकी कधी जाहीर केली जाणार? असा प्रश्न बाजार अभ्यासक गाेविंद वैराळे, विजय जावंधिया यांच्यासह अभ्यासू शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

केंद्र सरकार दरवर्षी १४ खरीप पिकांची एमएसपी जाहीर करत असून, सीएसीपी (कमिशन फाॅर ॲग्रीकल्चर काॅस्ट ॲण्ड प्राइजेस)च्या माध्यमातून या पिकांचा राज्यनिहाय उत्पादन खर्च जाणून घेण्याची प्रक्रिया जानेवारीपासून सुरू केली जाते. सीएसीपी या पिकांची एमएसपी ठरवून त्यांचा अहवाल दरवर्षी ३१ मार्चपूर्वीच केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाला सादर करते. त्यानंतर केंद्र सरकारची सीसीइए (कॅबिनेट कमिटी ऑन इकाॅनाॅमिक अफेअर्स) सीएसीपीच्या अहवालावर शिक्कामाेर्तब करून एमएसपी जाहीर करते. या महिनाभराच्या प्रक्रियेला तीन महिन्यांचा काळ लागावा, याबाबत अभ्यासकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

खरीप पिकांच्या एमएसपीनुसार शेतकरी त्या पिकांच्या पेरणीचे नियाेजन करतात. मात्र, केंद्र सरकार ऐन पावसाळ्याच्या ताेंडावर एमएसपी जाहीर करत असल्याने शेतकऱ्यांना या पिकांचे नियाेजन करणे शक्य हाेत नाही. शिवाय, त्यांच्या मनात संभ्रम निर्माण हाेऊन त्यांची फसगत हाेते, असेही शेतमाल बाजार अभ्यासकांनी सांगितले.

केंद्र सरकारची दीर्घ दिरंगाई

केंद्र सरकार मागील पाच वर्षांपासून एमएसपी जाहीर करण्याला दीर्घ दिरंगाई करत आहे. सन २०१८-१९च्या हंगामासाठी ४ जुलै, २०१९-२०च्या हंगामासाठी ३ जून, २०२०-२१च्या हंगामासाठी १ जून, २०२१-२२च्या हंगामासाठी ९ जून आणि सन २०२२-२३च्या हंगामासाठी ८ जून राेजी एमएसपी जाहीर केली हाेती.

एमएसपीमध्ये वाढ व निवडणूक वर्ष

सध्या कापूस, साेयाबीन, व माेहरीचे दर कमालीचे काेसळले आहेत. सध्या कापूस व साेयाबीनचे दर एमएसपीच्या आसपास आले असून, माेहरीचे दर एमएसपीपेक्षा कमी आहेत. निवडणुकीच्या वर्षी एमएसपीमध्ये बऱ्यापैकी वाढ केली जाते. त्यामुळे सन २०२३-२४ च्या हंगामातील खरीप पिकांच्या एमएसपी दरात केंद्र सरकारने माेठी वाढ करावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे कापूस, साेयाबीन व माेहरीच्या दरवाढीला आधार मिळणार असल्याचे शेतमाल बाजार विश्लेषकांनी सांगितले.

एमएसपीमध्ये वाढ का हवी?

अलीकडे खते, बियाणे यासह अन्य कृषी निविष्ठांच्या किमतीत माेठी वाढ झाली असून, वाहतूक व मजुरीचा खर्च वाढला आहे. वाढीव मजुरी देऊनही मजूर मिळत नाहीत. पिकांचा एमएसपी दर उत्पादन खर्चापेक्षा कितीतरी कमी असताे. दर नियंत्रणासाठी केंद्र सरकार काही घातक उपाययाेजना करून दर आटोक्यात आणते. त्यामुळे एमएसपी दर वाढविणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

एमएसपी दरावर शेतकऱ्यांच्या पिकांचे नियाेजन अवलंबून असते. या नियाेजनासाठी शेतकऱ्यांना एक महिना तरी हवा असताे. केंद्र सरकारने कापसासह इतर पिकांच्या एमएसपी दरात माेठी वाढ केल्यास त्याचा बाजारभावावर परिणाम हाेऊन शेतकऱ्यांना आर्थिक फायदा हाेईल.

- गाेविंद वैराळे, माजी सरव्यवस्थापक, कापूस पणन महासंघ, महाराष्ट्र राज्य

टॅग्स :agricultureशेतीCrop Insuranceपीक विमा