शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

मनपा आयुक्तांचे बोलवते धनी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 00:17 IST

Sandeep Joshi asked, nagpur news कायद्यानुसार स्थायी समितीने बजेट मंजूर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. मनपा आयुक्तांनी मंजूर कामांना ब्रेक लावले आहे. भाजपच्या कार्यकाळात शहरात विकास कामे होऊ नये, असे काही लोकांना वाटते. त्यांचे बोलवते धनी वेगळे आहेत. येणाऱ्या काळात ते पुढे येतीलच, गरज पडल्यास या विरोधात भाजपसंघर्षाची भूमिका घेईल, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

ठळक मुद्देसंदीप जोशी यांचा सवाल : विकास कामासाठी गरज पडल्यास संघर्ष

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कायद्यानुसार स्थायी समितीने बजेट मंजूर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. मनपा आयुक्तांनी मंजूर कामांना ब्रेक लावले आहे. भाजपच्या कार्यकाळात शहरात विकास कामे होऊ नये, असे काही लोकांना वाटते. त्यांचे बोलवते धनी वेगळे आहेत. येणाऱ्या काळात ते पुढे येतीलच, गरज पडल्यास या विरोधात भाजपसंघर्षाची भूमिका घेईल, असा इशारा महापौर संदीप जोशी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

माझ्या कार्यकाळात तीन आयुक्तांच्या कामकाजाचा अनुभव घेतला. तुकाराम मुंढे यांच्या कार्यकाळात महापौर निधीतील प्रकल्प अपूर्ण राहिले. नागरिकांशी संवाद साधण्यासाठी वॉक अ‍ॅन्ड टॉक विथ मेअर, ब्रेकफास्ट विथ मेअर उपक्रम राबविले. जनता दरबार घेतले. स्वच्छता मोहिमेसाठी मम्मी पापा यू टू मोहीम राबविली. यातून स्वच्छतेत नागपूरचा क्रमांक १८ आला. आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या कार्यकाळात कोरोना रुग्णांसाठी चांगली सुविधा निर्माण झाली. असे जोशी यांनी सांगितले.

ओसीडब्ल्यूची खुशाल चौकशी करावी

यूपीए सरकारने नागपूर शहरातील २४ बाय ७ योजनेची प्रशंसा करून पुरस्कार दिला होता. या प्रकल्पात कोणत्याही प्रकारची अनियमितता नाही. काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या कार्यकाळात शहरात १५ जलकुंभ उभारण्यात आले. तर भाजपच्या १५ वर्षांच्या कार्यकाळात ५५ जलकुंभ उभारले, अमृत योजनेच्या माध्यमातून लवकरच पुन्हा ३० जलकुंभ उभारले जात आहेत. वर्षभराने होत असलेली महापालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेवून विकास कामांना ब्रेक लावण्यासाठी चौकशी केली जात आहे. ती खुशाल करावी. असे संदीप जोशी यांनी प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.

मुुंढेंमुळे शौचालय झाले नाही

महापौर निधीतून शौचालय उभारण्याचा निर्णय घेतला. परंतु तत्कालीन आयुक्त तुकाराम मुुंढे यांनी फाईल रोखली. त्यांनी महापौर फंडातील एक रुपयाही खर्च केला नाही. यामुळे शौचालय उभारता आले नाही, अशी खंत जोशी यांनी व्यक्त केली. मुंढे यांच्याशी वैयक्तिक मतभेद नव्हते. परंतु एकाधिकारहीमुळे ते ऐकत नव्हते.

पदवीधर निवडणुकीवर मंथन

पदवीधर मतदार संघातील निवडणुकीनंतर पॉझिटिव्ह आलो. अजूनही आजारी आहे. या निवडणुकीवर पक्षात मंथन सुरू आहे. भाजपा सर्वधर्मियांचा पक्ष आहे. निवडणुकीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करणर असल्याचे जोशी म्हणाले.

टॅग्स :Sandip Joshiसंदीप जोशीRadhakrishnan. Bराधाकृष्णन बी.