शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

कोण खरे, तावडे की विद्यापीठ प्रशासन ?

By admin | Published: April 23, 2017 2:50 AM

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती वादात सापडण्याची चिन्हे आहेत.

पदभरतीसंदर्भात संभ्रम : तीन महिन्यांत कशी होणार १०० टक्के पदांची भरती? नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती वादात सापडण्याची चिन्हे आहेत. राज्य शासनाच्या निर्देशांचा हवाला देत प्रशासनाने २३ जागांसाठी जाहिरात काढली. मात्र एकूण पदांच्या ५० टक्के भरतीचा नियम शिक्षण क्षेत्रासाठी लागू नाही, असा दावा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला. अशास्थितीत आता नेमके कोण खरे, असा प्रश्न विद्यापीठ वर्तुळात उत्पन्न होत आहे. विद्यापीठांत सत्रप्रणाली लागू झाल्यामुळे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढला आहे; शिवाय येत्या तीन महिन्यांत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कमीतकमी ५० टक्के रिक्त पदांवर भरती होईल, अशी अपेक्षा होती. मात्र शासनाच्या निर्देशांवर बोट ठेवत केवळ २३ शिक्षकेतर पदांची भरती करण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला. राज्य शासनाने पदभरतीसंदर्भात ५० टक्के रिक्त पदांच्या भरतीसंदर्भात जारी केलेल्या दिशानिर्देशांचा हवाला यात अधिकाऱ्यांनी दिला. मात्र वित्त विभागाने वेळोवेळी जारी केलेले पदभरतीचे निर्देश हे शिक्षण व पोलीस विभागाला लागू नव्हतेच, असे विनोद तावडे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. वित्त विभागाने काही विभागांना अगोदर ७५ टक्के पदभरतीची सूट दिली होती; मात्र नंतर सुधारणा करून ही मर्यादा ५० टक्क्यांवर आणली होती. शिक्षकेतर प्रवर्गात सरळसेवेतील रिक्त पदांच्या ५० टक्के किंवा एकूण मंजूर पदांच्या ४ टक्के यापैकी जे कमी असतील ते भरा, असे शासननिर्देशात नमूद होते. त्यानुसारच प्रक्रिया राबवत असल्याचा दावा विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी केला आहे. तावडे यांनी नागपुरात पदभरतीची मर्यादा कोण खरे, तावडे की विद्यापीठ प्रशासन ? शिक्षण विभागासाठी नाही, असे सांगितले. मंत्र्यांनीच स्पष्टोक्ती केल्यामुळे नागपूर विद्यापीठातील भरतीबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, याबाबत लेखी निर्देश नेमके कधी देण्यात आले होते, याबाबत तावडे यांनी कुठलीही स्पष्टोक्ती केली नाही. पूर्ण पदभरतीबाबत निर्देश केव्हा? विद्यापीठांची गरज व मागणी लक्षात घेता पुढील तीन महिन्यांत सर्व विद्यापीठांतील रिक्त पदे भरण्यात येतील, अशी घोषणा तावडे यांनी नागपुरात केली. मात्र पदभरतीची प्रक्रिया लक्षात घेता खरोखरच तीन महिन्यांत पदांची भरती शक्य नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यासंदर्भात शासकीय निर्देश जारी करणे आवश्यक आहे. विद्यापीठांना पुढील चार महिन्यांत प्राधिकरणांच्या निवडणुकादेखील घ्यायच्या आहेत. या पार्श्वभूमीवर तावडे यांची घोषणा किती प्रत्यक्षात उतरेल, हा देखील एक मोठा प्रश्न असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले.