शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI Repo Rate : ईएमआय कमी होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, यावेळीही रेपो दर 'जैसे थे'
2
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
3
Tejashwi Yadav : "भाजपा आरजेडीला घाबरते, आमचं चारित्र्य खराब करायचंय; ते सत्तेत येऊ शकत नाहीत म्हणून..."
4
Haryana Assembly Election Result 2024 : राम रहिम याचा भाजपासह काँग्रेसलाही फायदा; हरयाणा निकालातील आकडेवारीतून माहिती
5
'भाऊ' Bigg Boss च्या पुढच्या पर्वात दिसणार का? रितेश देशमुख म्हणाला, 'हा निर्णय तर...'
6
धक्कादायक! हिंदू नाव वापरुन २२ पाकिस्तानी राहायचे, बनावट कागदपत्रे बनवून देणाराही अटकेत
7
दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा महिलेवर हल्ला; घरापासून १०० फूट ओढत नेलं अन्...
8
PhysicsWallahचा IPO येणार! कंपनीनं सुरू केलं काम; ४ इन्व्हेस्टमेंट बँकर्सचीही केली नियुक्ती
9
"हा देखावा कशासाठी?"; सामूहिक अत्याचाराच्या जागेची पाहणी करणाऱ्या सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र
10
बहुमत असले तरी अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स भाजपसोबत जाणार? जम्मू काश्मीरमध्ये लावले जातायत अंदाज
11
ऑस्ट्रेलियानं लावली न्यूझीलंडची वाट; आता सेमीसाठी टीम इंडिया कशी ठरेल पात्र?
12
मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू
13
कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा
14
Savitri Jindal Haryana Election Networth : हिसारमधून निवडणूक जिंकणाऱ्या सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ माहितीये? भल्याभल्यांना टाकलंय मागे
15
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
16
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
17
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
18
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
19
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
20
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल

डस्टबिनचा आग्रह कशासाठी?

By admin | Published: May 12, 2017 2:52 AM

नागपूर शहराची लोकसंख्या ३० लाखांवर गेली आहे. लोकसंख्येचा विचार करता सहा ते सात हजार सफाई कर्मचाऱ्यांची गरज आहे.

कचराच तर उचलला जात नाही : सफाई कर्मचाऱ्यांचाही तुटवडा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहराची लोकसंख्या ३० लाखांवर गेली आहे. लोकसंख्येचा विचार करता सहा ते सात हजार सफाई कर्मचाऱ्यांची गरज आहे. परंतु प्रत्यक्षात चार हजार कर्मचारी कार्यरत आहेत. सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने शहरातील सर्व भागातील कचरा दररोज उचलला जात नाही. काही भागात दिवसाआड घंटागाडी येते. त्यामुळे कचरा पडून असतो. यावर प्रभावी उपाययोजना करण्याचे सोडून १४ कोटींच्या डस्टबिन मोफत वाटपाचा निर्णय घेण्यात आला आहे. मोफत डस्टबिनचा आग्रह कशासाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागात जवळपास चार हजार सफाई कर्मचारी आहेत. परंतु यातील हजाराहून अधिक कर्मचारी महापालिका मुख्यालय वा झोन कार्यालयात कामकाज करतात. म्हणजेच रेकॉर्डला चार हजार सफाई कर्मचारी कार्यरत असले तरी प्रत्यक्षात तीन हजार कर्मचारी स्वच्छतेच्या कामात आहेत. अशीच परिस्थिती कनक रिसोर्सेस कंपनीकडे काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची आहे. कंपनीकडे १५०० कर्मचारी कार्यरत आहे. परंतु प्रत्यक्षात याहून अधिक कर्मचारी कार्यरत असल्याचे दर्शविण्यात येते. कर्मचाऱ्यांना ५.५० कोटी कधी मिळणार शहरातील कचरा उचलण्याची जबाबदारी असलेल्या कनक रिसोर्सेस यांच्याकडे दीड हजार सफाई कर्मचारी आहे. परंतु या कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन मिळत नव्हते. कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली. कामगार आयुक्तांनी निर्देश दिल्यानंतर शासन निर्णयानुसार वेतन देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाला घ्यावा लागला. परंतु गेल्या ९ महिन्यातील वाढीव भत्ता व वेतनातील फरक अशी ५ कोटी ५० लाखांची रक्कम सफाई कर्मचाऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. आयुक्तांनी वेळोवेळी आश्वासने व तारखा दिल्या. मात्र अजूनही हा प्रश्न प्रलंबित आहे. डस्टबिनचा निर्णय रद्द करण्याची मागणी ओला व कोरडा कचरा वेगवेगळा ठेवण्यात यावा, यासाठी शहरातील ५ लाख ५० हजार घरमालक व दुकानदारांना ११ लाख डस्टबिन मोफत वाटप करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. यावर तब्बल १३.६४ कोटींचा खर्च केला जाणार आहे. हा जनतेच्या पैशाचा दुरुपयोग आहे. हा चुकीचा निर्णय रद्द करण्यात यावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दुनेश्वर पेठे शुक्रवारी आयुक्तांना निवेदन देणार आहेत. काँग्रेस पक्षानेही डस्टबिनचा निर्णय रद्द करण्यात यावा, अशी भूमिका घेतली आहे.