शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
10
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
11
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
12
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
13
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
14
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
15
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
16
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
17
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
18
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
19
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
20
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई

फुटाळा तलाव स्वच्छ का ठेवला जात नाही ?

By admin | Published: August 28, 2014 2:04 AM

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणरायाचे आगमन जवळ आल्यावरच नागपूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग येते. सध्या त्यांनी फुटाळा तलावाच्या पाण्यातील कचरा व घाण साफ करण्यास

नागपूर : संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत गणरायाचे आगमन जवळ आल्यावरच नागपूर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग येते. सध्या त्यांनी फुटाळा तलावाच्या पाण्यातील कचरा व घाण साफ करण्यास प्रारंभ केला आहे, ही आनंदाची बाब असली तरी शहरवासीयांच्या आकर्षणाचे केंद्र असलेला हा तलाव वर्षभर स्वच्छ का ठेवला जात नाही, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपशहर प्रमुख प्रशांत पवार यांनी केला आहे. गणेशउत्सवानिमित्त गणेशभक्त तलावावर विसर्जनासाठी मोठ्या संख्येने येतील तेव्हा महापालिकेच्या बेजबाबदार कारभाराचे प्रदर्शन नागपूरकरांना होईल, या भीतीपोटीच फक्त महापालिकेने फुटाळा तलावाची थातूरमातूर साफसफाई चालविली आहे, अशी टीकाही त्यांनी केली. काठावरच्या पाण्यावर तरंगत असलेला कचरा अणि गवत काढून ते काठावरच टाकून देण्यात आले आहे. पुढे हाच कचरा पुन्हा तलावात जाण्याचा धोका आहे, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. संपूर्ण तलावात मोठ्या प्रमाणात शेवाळ तयार झाले असून, गवत वाढले आहे. त्यामुळे पाणी प्रदूषित झाले असून, तलावातील जलचरांना धोका निर्माण झाला आहे. याचा परिसरातील नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे, याकडेही पवार यांनी लक्ष वेधले. गणपती उत्सव असो अथवा नसो, महापालिकेने शहरातील सर्व तलावांची विनाविलंब सफाई करावी, अशी मागणी पवार यांनी केली आहे. ़(प्रतिनिधी)