शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

ग्राहक कधी होणार जागा ?

By admin | Published: March 15, 2016 4:54 AM

ग्राहक संरक्षण कायदा तयार झाला. त्याद्वारे ग्राहक न्यायालये आणि ग्राहक संरक्षण कक्ष ही व्यवस्था अंमलात आली. या

मोरेश्वर मानापुरे ल्ल नागपूरग्राहक संरक्षण कायदा तयार झाला. त्याद्वारे ग्राहक न्यायालये आणि ग्राहक संरक्षण कक्ष ही व्यवस्था अंमलात आली. या सरकारी व्यवस्थेच्या मर्यादाही स्पष्ट झाल्या. पण हक्काबाबत ग्राहक अजूनही अज्ञानी असल्याची बाब जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचापुढे आलेल्या तक्रारींच्या संख्येवरून पुढे आली आहे. मंचपुढे सर्वाधिक तक्रारी बिल्डर, डेव्हलपर्स आणि विमासंदर्भात येतात. आता वीजचोरीसंदर्भात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येत असल्यामुळे या तक्रारी मंचपुढे येत नाहीत. तसेच मोबाईलसंदर्भातील तक्रारीच्या निपटाऱ्यासाठी स्वतंत्र लवाद सुरू झाला आहे. त्यामुळे या तक्रारी येणे बंद झाले आहे. त्यानंतरही तक्रारींची संख्या पाहता महाराष्ट्रात नागपूर दुसऱ्या क्रमांकावर आहे. रेल्वे व बससेवा, ट्रॅव्हल्स (बसमधून पाणी गळणे व वेळेत न पोहोचणे), वैद्यकीय, वेळेत दिलेले वचन न पाळल्याने ग्राहकांना होणारा आर्थिक व मानसिक त्रास, कागदपत्रे असतानाही शासकीय कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी वेळेत न मिळणे आदींसह ग्राहक सेवेशी संबंधित अनेक तक्रारी मंचपुढे येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. आॅनलाईन सेवा उपलब्ध होणार४ग्राहकांना जागरूक करण्यासाठी शासनातर्फे लवकरच आॅनलाईन सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे तक्रारींचा ओघ वाढेल आणि ग्राहक आपल्या हक्काच्या सेवेसंदर्भात अधिक जागरूक होईल.आतापर्यंत १९,५२७ तक्रारी दाखल४नागपूर फोरमची स्थापना १९८९ मध्ये झाली; तेव्हापासून १९,५२७ तक्रारी दाखल करण्यात आल्या. त्यापैकी १८,२२४ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. हे प्रमाण ९३ टक्के आहे. सध्या १३१३ तक्रारी प्रलंबित आहेत. नागपूर मंचपुढे महिन्याला सरासरी ८० ते ९० तक्रारी दाखल होतात. यावर्षी जानेवारी महिन्यात ८९ तर फेब्रुवारीमध्ये ९२ तक्रारी आल्या. १ जानेवारी २०१५ ते ३१ डिसेंबर २०१५ या काळात ग्राहक सेवेसंदर्भात एकूण ८५२ तक्रारी दाखल झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. जानेवारीमध्ये ७८ तर फेब्रुवारी महिन्यात ४४ तक्रारी निकाली काढण्यात आल्या. अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागांतर्गत कार्यरत जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच नागपूर येथे सेवानिवृत्त अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम.जी. चिलबुले, सदस्य अ‍ॅड. पी.आर. पाटील आणि अ‍ॅड. मंजिश्री खनके कार्यरत आहेत.