शहरं
Join us  
Trending Stories
1
Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं
2
"तुम्ही मला मत दिलं, तर मी तुम्हाला चंद्रावर घर देईन", उद्धव ठाकरे असं का म्हणाले?
3
कोण आहेत मेहराज मलिक? ज्यांच्यासाठी अरविंद केजरीवालांचा 'झाडू' चालला; भाजपचा किती मतांनी केला पराभव?
4
जयराम रमेश यांनी डेटा अपडेटमध्ये उशीर केल्याचा आरोप केला; निवडणूक आयोगाने प्रत्येक मिनिटांचे उत्तर दिले
5
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: विजयाचे श्रेय पंतप्रधान मोदींना- हरयाणाचे मुख्यमंत्री सैनी यांची प्रतिक्रिया
6
Uddhav Thackeray : "गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५०० रुपये; हा महाराष्ट्रधर्म नाही" - उद्धव ठाकरे
7
ढोल वाजवले, फटाके फोडले; लाडू, जिलेबी वाटली, पण… काँग्रेसच्या उत्साही कार्यकर्त्यांवर नामुष्की 
8
"...हाच आजच्या निवडणूक निकालाचा धडा"; अरविंद केजरीवाल निकालावर काय म्हणाले?
9
ओमर अब्दुल्ला होणार जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री; विजयानंतर फारुख अब्दुल्लांची घोषणा
10
'त्या' लोकांना दहशतवाद्यांसारखी वागणूक द्या; तुषार गांधींची उद्धव ठाकरेंकडे मागणी
11
हरयाणात 'मोदी मॅजिक', राहुल गांधींनी जिथे सभा घेतल्या, त्या उमेदवारांचे काय झाले? पाहा...
12
Bharti Airtel करणार Tata Group सोबत मोठी डील, टाटांची 'ही' कंपनी खरेदी करण्याची तयारी
13
Haryana Election Result : "हरयाणात नक्कीच काँग्रेस पक्ष सरकार स्थापन करेल...", विनेश फोगाटचा दावा
14
गाडीसाठी 20, घरासाठी 60 लाख... हरयाणाच्या आमदारांना किती वेतन मिळते? 
15
हरयाणात काँग्रेसला अजुनही होप्स...? 'या' जागा ठरवणार कोणाचे सरकार, मताधिक्य केव्हाही....
16
Eknath Shinde News : मंत्रिमंडळ बैठकीसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आजचे सर्व कार्यक्रम अचानक रद्द, कारण...
17
YouTuber ने ठोकली १.७ कोटींची सुपरकार, गाडी चालवताना करत होता Live स्ट्रीम (Video)
18
"आधी बायकोसाठी बाथरुम बांधणार", 'बिग बॉस मराठी' विजेता सूरज चव्हाणचं वक्तव्य, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
19
मोदी बागेत रणनीती! सुप्रिया सुळेंच्या कारमध्ये चेहरा लपवणारा 'ती' व्यक्ती कोण?
20
Bigg Boss 18 : "तुम्ही माझ्या हृदयात स्थान बनवलं आहे", 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंचं चाललंय तरी काय?

नागपूर रेल्वेस्थानक कधी होणार स्मार्ट?

By admin | Published: May 19, 2017 2:51 AM

विकासात उपराजधानीत आगेकूच करीत असताना नागपूर रेल्वेस्थानक मात्र स्वच्छतेच्या बाबतीत ढांग ठरले

स्वच्छता पुरस्कारात पिछाडी : प्रशासनाची उदासीनता कारणीभूत लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विकासात उपराजधानीत आगेकूच करीत असताना नागपूर रेल्वेस्थानक मात्र स्वच्छतेच्या बाबतीत ढांग ठरले असून चंद्रपूर, बल्लारशा, वर्धा रेल्वेस्थानकाने बाजी मारून नागपूर रेल्वेस्थानकावर मात केल्याचे स्पष्ट झाले आहे. क्वालिटी कंट्रोल आॅफ इंडियाने देशभरातील ४०७ रेल्वेस्थानकांवर स्वच्छतेबाबत सर्वेक्षण केले. यात नागपूर रेल्वेस्थानकाचा २३७ वा क्रमांक आला असून वर्धा रेल्वेस्थानक ३९ व्या क्रमांकावर, चंद्रपूर ३८ वा क्रमांक, बल्लारशा स्थानकाला ३३ वा क्रमांक मिळाला आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर असलेल्या अस्वच्छतेमुळे या सर्वेक्षणात नागपूरला अव्वल स्थान मिळू शकलेले नाही. रेल्वेस्थानकाच्या स्वच्छतेच्या बाबतीत रेल्वे रुळ, डस्टबीन, शौचालय हे निकष ठेवण्यात आले होते. नागपूर रेल्वेस्थानकावर या तिन्ही बाबीत कमालीची अस्वच्छता असून त्याबाबत नेहमीच प्रसार माध्यमातून टीकाही करण्यात येते. परंतु अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे या बाबीत कोणतीही सुधारणा आजवर होऊ शकलेली नाही. नागपूरचा नावलौकिक वाढविण्यासाठी आणि प्रवाशांना स्वच्छ रेल्वे परिसर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने वेळीच पावले उचलून रेल्वेस्थानकावरील स्थिती नियंत्रणात आणण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रवाशांचे योगदानही महत्त्वाचे रेल्वे प्रशासनासोबत रेल्वे प्रवाशांनीही स्वच्छतेचे नियम पाळून रेल्वेगाड्या, रेल्वेस्थानकाचा परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. परंतु अनेक प्रवासी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. केळीची साले प्लॅटफार्म रेल्वे रुळावर फेकणे, शौचालयात पाण्याच्या बॉटल टाकणे, खर्रा, पान खाऊन पिचकाऱ्या मारणे आदी प्रकार करून रेल्वेस्थानकाला अवकळा प्राप्त करून देण्यात प्रवाशांचाही मोठा हातभार आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपली जबाबदारी ओळखून रेल्वे परिसर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. खासगीकरणामुळे वाईट स्थिती रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानक परिसराच्या सफाईचे कंत्राट खासगी कंत्राटदाराला दिले आहे. त्यामुळे कंत्राटदार पैसे वाचविण्यासाठी कमी मनुष्यबळ कामावर ठेवणे, कामावरील कामगारांना कमी वेतन देणे यासारखे प्रकार करतो. त्यामुळे दिवसेंदिवस रेल्वेस्थानकाच्या स्वच्छतेचा मुद्दा गंभीर बनत चालला आहे. या कंत्राटदारांवर रेल्वे प्रशासनाचा कुठलाच अंकुश राहिलेला नसल्यामुळे रेल्वेस्थानक स्वच्छतेच्या बाबतीत पिछाडले आहे.