शहरं
Join us  
Trending Stories
1
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
2
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
3
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
4
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
5
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
6
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
7
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
8
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
9
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
10
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
11
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
12
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
13
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
14
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
15
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
16
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
17
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
18
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

खैरलांजी हत्याकांडातील आरोपीला पाठीशी घालणाऱ्यांना मत देणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 12:48 AM

बौद्ध आंबेडकरी समाजातील काही बुद्धिजीवी हे भाजपला हरविण्यासाठी काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन करीत आहेत. तेव्हा खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार का? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते, भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष आणि खैरलांजी हत्याकांडानंतर झालेल्या आंदोलनातील एक प्रमुख कार्यकर्ते रवी शेंडे यांनी सोमवारी येथे पत्रपरिषदेत उपस्थित केला.

ठळक मुद्देवंचित बहुजन आघाडीचा सवाल :काँग्रेस-भाजप सारखेच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बौद्ध आंबेडकरी समाजातील काही बुद्धिजीवी हे भाजपला हरविण्यासाठी काँग्रेसला मतदान करा, असे आवाहन करीत आहेत. तेव्हा खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांना तुम्ही मतदान करणार का? असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते, भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष आणि खैरलांजी हत्याकांडानंतर झालेल्या आंदोलनातील एक प्रमुख कार्यकर्ते रवी शेंडे यांनी सोमवारी येथे पत्रपरिषदेत उपस्थित केला.रवी शेंडे म्हणाले,भाजप हा जातीयवादी पक्ष आहे. त्यामुळे त्याला हरवणे आवश्यक आहे. परंतु बौद्ध आंबेडकरी समाजातील काही बुद्धिजीवी लोक भाजपची भीती दाखवून काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करीत आहेत. हे बरोबर नाही. त्यांना काँग्रेसचा प्रचार करायचाच असेल तर उघडपणे करावा, परंतु छुपा अजेंडा चालवू नये. काँग्रेसने ७० वर्षांपासून आपल्या समाजावर सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रात अन्याय केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेमध्ये निवडून येऊ नये म्हणून कॉँग्रेसनेच प्रयत्न केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लोकसभा निवडणुकीत निवडून येऊ दिले नाही. दोनवेळा त्यांचा पराभव केला. इतकेच नव्हे तर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांना हिंदू स्मशान भूमीत जागा देण्यासाठी मज्जाव केला. हा इतिहास आम्ही विसरणार आहोत का? असा प्रश्नही शेंडे यांनी उपस्थित केला.संपूर्ण जगाला हादरवून टाकणारे खैरलांजी हत्याकांड भंडारा जिल्ह्यात घडले. भोतमांगे कुटुंबाला संपवण्यात आले. देशात जेव्हा कधी समाजावर जातीय हल्ले होतात, तेव्हा खैरलांजीचे उदाहरण दिले जाते. इतके अमानुष ते हत्याकांड होते. या हत्याकांडातील आरोपींना शिक्षा मिळावी म्हणून देशभरात आंदोलन झाले. आम्हीही त्यात सहभागी होतो. हजारो आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले. हजारो तरुण तुरुंगात गेले. हजारोंनी लाठ्याकाठ्या खाल्ल्या. इतकेच नव्हे तर अनेक जण गोळीबरालाही सामोरे गेले. परंतु त्याच वेळी खैरलांजी हत्याकांडातील आरोपींना वाचविण्याचे काम काही नेतेमंडळी करीत होते. अशा लोकांना काँग्रेसने उमेदवारी दिली. तेव्हा अशा लोकांच्या पाठीमागे समाजाने कसे उभे राहावे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.खैरलांजीचा लढा संपलेला नाहीखैरलांजी हत्याकांडातील आरोपीला शिक्षा मिळावी यासाठी समाजाचा लढा आजही सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. तो संपलेला नाही, याची आठवणही रवी शेंडे यांनी यावेळी करून दिली.वंचित बहुजन आघाडी हाच पर्यायकाँग्रेस-भाजपा सारखेच आहे. बौद्ध आंबेडकरी समाजाचे एकूणच वंचित समाजाचे भले हे दोन्ही पक्ष करू शकत नाही. त्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर व एमआयएमचे नेते खा. असदुद्दीन ओवेसी यांनी निर्माण केलेली वंचित बहुजन आघाडी ही एक सक्षम पर्याय आहे. त्यामुळे समाजाने या आघाडीच्या पाठीमागे उभे राहावे, असे आवाहनही रवी शेंडे यांनी केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnagpur-pcनागपूरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019