शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
5
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
6
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
7
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
8
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
9
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
10
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
11
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
12
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
13
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
14
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
15
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
16
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
17
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
18
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
19
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
20
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु

Winter Session Maharashtra : आमच्याकडे शिंदे-फडणवीस सरकारचे ४० घोटाळे; 'बॉम्ब'च्या इशाऱ्यानंतर संजय राऊतांचा नवा धमाका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 11:41 AM

गेल्या ८ दिवसांपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात जमीन घोटाळ्यावरुन विरोधी पक्षांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

गेल्या ८ दिवसांपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे.  अधिवेशनात जमीन घोटाळ्यावरुन विरोधी पक्षांनी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. खासदार संजय राऊत यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर घोटाळ्याचे आरोप करत टीका केली.  

'महाराष्ट्रात भविष्यात राजकीय परिवर्तन मोठ्या होणार आहेत. या संदर्भात पाऊलं पडत आहेत, शिवसेनेच्या नेतृत्वात ही क्रांती होणार आहे. समाजातील राजकीय घटक एकत्र येत आहेत, वंचित बहुजन आघाडीचाही यात समावेश आहे. या संदर्भातील माहिती तुम्हाला पक्ष  प्रमुख देतील, असंही खासदार संजय राऊत म्हणाले. ( Winter Session Maharashtra)

राज ठाकरेंच्या खुर्चीमागे वसंत मोरे; 'त्या' किस्स्याची पुण्यात रंगली चर्चा

मुंबईत सर्व देश सामावला आहे, फक्त कर्नाटक नाही. मुंबईती कानडी बांधवांवर अत्याचार होत नाहीत, मुंबईत बिहार, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशमधील लोक राहतात, सर्वजण शांततेत राहतात, त्यांच्यावर अत्याचार होत नाहीत. तसे सीमाभागात होते का? सीमाभागात गेली 75 वर्षे मराठी बांधवांवर अत्याचार होत आहेत, त्यामुळे आधी सीमाभाग केंद्रशासीत होईल, असंही संजय राऊत म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकारमधील फक्त शिंदे गटातील मंत्र्यांची प्रकरणे बाहेर येत आहेत. सगळी प्रकरणे गंभीर आहेत, काही लोक म्हणत आहेत कुठे बॉम्ब फुटतोय, हे काय आहे. हे फक्त टोकन आहेत अजून मोठे बॉम्ब आहेत. एनआयटी घोटाळा, संजय राठोड यांचा जमिनीचा भ्रष्टाचार, अब्दुल सत्तार यांची कलेक्शनगिरी, उद्योगमंत्र्यांच प्रकरण, अनेक प्रकरणे आमच्याकडे आहेत. ही प्रकरणे आम्हाला देणारे तुमचे सहकारी आहेत, असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला. 

हा भ्रष्टाचाराचा वेताळ घेऊन फिरण देवेंद्र फडणवीस यांना ओझ झाले असेल, महाराष्ट्रात भाजप बदनाम होत आहे. महाराष्ट्रात भ्रष्ट मंत्र्यांनी चालवलेले हे सरकार आहे. ४० आमदार आणि मंत्र्यांचे घोटाळे बाहेर येणार आहेत, असंही संजय राऊत म्हणाले. 

हे सरकार गेंड्याच्या कातडीचे आहे, या सरकारमध्ये प्रमाणीकपणा नाही.  हे ४० आमदार अपात्र ठरणार आहेत. शिवसेनेच्या आमदारांना सभागृहात बोलू दिले जात नाही. विधानसभा अध्यक्ष पक्षपातपणा करत आहेत. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन