शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

नामनिर्देशनपत्र मागे घेतल्यास निवडणूक खर्च सादर करण्याची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 19:15 IST

Nagpur News नामनिर्देशनपत्र मागे घेण्यात आले, अशा प्रकरणांमध्ये निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्याची गरज नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली.

ठळक मुद्देग्राम पंचायत सदस्यांच्या अपात्रतेचे वादग्रस्त आदेश रद्द

नागपूर : नामनिर्देशनपत्र मागे घेण्यात आले, अशा प्रकरणांमध्ये निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्याची गरज नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. त्यामुळे उच्च न्यायालयाने दोन ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेचे वादग्रस्त आदेश रद्द केले.

निवडणूक आयोगाचा हा निर्णय शेकडो उमेदवारांना दिलासा देणारा ठरला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुका येथील भाडगनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये इंदू खोडके व शीतल गोरे यांनी दोन वॉर्डांतून नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. त्यानंतर त्यांनी एकेक नामनिर्देशनपत्र मागे घेतले. नामनिर्देशनपत्र कायम ठेवले त्या वॉर्डामधून त्या दोघी १८ जानेवारी २०२१ रोजी निवडून आल्या. दरम्यान, त्यांनी संबंधित वॉर्डातील निवडणुकीवर झालेल्या खर्चाचा हिशेब वेळेत सादर केला. परंतु, अर्ज मागे घेतला त्या वॉर्डातील निवडणुकीचा खर्च सादर केला नाही म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी दोघींनाही २८ जून २०२१ रोजी पाच वर्षांकरिता अपात्र ठरवले. त्या वादग्रस्त आदेशाविरुद्ध या सदस्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

त्यात उच्च न्यायालयाने नोटीस बजावल्यानंतर, राज्य निवडणूक आयोगाने ७ सप्टेंबर २०२१ रोजी परिपत्रक जारी करून नामनिर्देशनपत्र मागे घेण्यात आले, अशा प्रकरणांमध्ये निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. उच्च न्यायालयाने ही बाब लक्षात घेता अपात्रतेचे वादग्रस्त आदेश रद्द करून ही याचिका निकाली काढली. प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. प्रदीप क्षीरसागर यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय