शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

महिला उद्योजकाने खेळला २५०० कोटींचा डाव

By admin | Published: January 14, 2016 3:35 AM

उपराजधानीत दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा डबाबंद कारभार चालतो. यात शेअर आणि वस्तू यांच्या खरेदी विक्रीमध्ये सट्टेबाजी केली जाते. याचे मूळ खोलवर आहे.

डबाबंद कारभाराचे वास्तव : दलालाशी वाद झाल्याने उघडे पडले पितळजगदीश जोशी नागपूरउपराजधानीत दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा डबाबंद कारभार चालतो. यात शेअर आणि वस्तू यांच्या खरेदी विक्रीमध्ये सट्टेबाजी केली जाते. याचे मूळ खोलवर आहे. ते किती खोलवर आहेत, याची माहिती एका महिला उद्योजकाच्या कारभारामुळे उघडकीस आली आहे. या महिला उद्योजकाने एका वर्षात तब्बल २५०० कोटी रुपयांची सौदेबाजी केली. सुरुवातीला नफा कमावणाऱ्या या महिला उद्योजकास नंतर तोटा होऊ लागताच तिने दलालाला परतावा करण्यास नकार दिला. यामुळे हे प्रकरण समोर आले.पश्चिम नागपूर येथील रहिवासी असलेली ही महिला उद्योजक ऊर्जा आणि खनिज उद्योगाशी संबंधित आहे. त्यांच्या कुटुंबीयांचा उद्योग मध्य प्रदेश आणि छत्तीसगडपर्यंत पसरलेला आहे. संबंधित शेअर दलालाशी एका दुसऱ्या महिलेच्या माध्यमातून तिची ओळख झाली. या महिलेने सुद्धा शेअर ट्रेडिंगमध्ये रुची दाखविली. यानंतर तो दलाल या महिला उद्योजकाच्यावतीने खरेदी-विक्री करू लागला. सुरुवातीला दोघांमधील व्यापारी संबंध चांगले राहिले. परतावा सुद्धा वेळेवर झाला. महिला उद्योजकाने मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्री केल्याने दलालाला सुद्धा तिच्यावर विश्वास बसला. ती एका प्रतिष्ठित उद्योजक कुटुंबातील सदस्य असल्याने तिला उधार देण्यात दलालाला कुठलाही धोका वाटला नाही. सूत्रानुसार २०१४ मध्ये एका वर्षात या महिलेने जवळपास २५०० कोटी रुपयांची खरेदी विक्री केली. या कालावधीत दलालीचे जवळपास ८ कोटी रुपये महिलेवर थकीत होते.शेअर ट्रेडिंगमध्ये नुकसाननागपूर : शेअर ट्रेडिंगमध्ये नुकसान होत असल्याने महिला उद्योजकाचा मोहभंग झाला. तिने हळूहळू खरेदी विक्री बंद केली. याची माहिती होताच संबंधित दलालाने महिला उद्योजकास आपली थकीत रक्कम परत मागण्यास तगादा लावला. हळूहळू करून थकीत रक्कम परत करण्याचे आश्वासन देत त्याला तिने शांत केले. परंतु वेळ होऊनही महिलेने त्याला पैसे परत केले नाही. त्यामुळे दलाल दु:खी झाला. दलाल आणि महिला उद्योजकाची सामाजिक पार्श्वभूमी एकच असल्याने त्याने प्रतिष्ठित नागरिकांच्या माध्यमातून वाद सोडवण्यास सांगितले. अनेक बैठका झाल्या परंतु कुठलाही तोडगा निघाला नाही. त्यामुळे दलालाला राग आला. त्यानंतर त्यांच्या संबंधांमध्ये वितुष्ट आले. दलालाचे कर्मचारी वसुलीसाठी थेट महिला उद्योजकाच्या घरी पोहोचले. महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसांना बोलावून दलालाच्या कर्मचाऱ्यास तुरुंगात धाडले. थकीत रक्कम परत करण्याऐवजी तुरुंगात पाठविल्याने दलाल संतापला. त्याने थकीत रक्कम वसूल करण्यासाठी कंबर कसली. त्याने पोलिसांना खरा प्रकार सांगितला. आता पोलीसही कायदेशीर बाबींवर विचार करीत असून यातून योग्य मार्ग शोधत आहे.(प्रतिनिधी)