शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
6
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
7
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
8
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
9
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
10
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
11
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
12
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
13
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
14
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
15
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
17
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
18
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
19
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
20
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका

महिलांचा सन्मान व्हावा

By admin | Published: January 11, 2016 2:56 AM

महिलांचा मान-सन्मान झाला, तर समाजाचा सन्मान होईल. त्यामुळे प्रत्येक समाजात महिलांचा सन्मान झाला पाहिजे,

सर्व भाषीय कलार समाजाचा मेळावा: सुदीप जायसवाल यांचे प्रतिपादन नागपूर : महिलांचा मान-सन्मान झाला, तर समाजाचा सन्मान होईल. त्यामुळे प्रत्येक समाजात महिलांचा सन्मान झाला पाहिजे, असे प्रतिपादन शहरातील प्रसिद्ध विधीतज्ज्ञ अ‍ॅड़ सुदीप जायसवाल यांनी केले. सर्व भाषीय कलार समाज ट्रस्टच्यावतीने रविवारी आयोजित युवक-युवती परिचय मेळावा आणि समाज महासंमेलनात ते बोलत होते. रेशीमबाग येथील जैन कलार समाज भवनात हा कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी केंद्र सरकारच्या केंद्रीय पर्यटन सल्लागार परिषदेचे सदस्य चंद्रपाल चौकसे होते. अतिथी म्हणून रवींद्र दुरुगकर, मोहनसिंह अहलुवालिया, जयनारायण चौकसे, त्रिलोकीनाथ शिवहरे, ओ. पी. जायसवाल, नारायणराव टाले, नरेंद्र वासेकर व सर्व भाषीय कलार समाज ट्रस्टचे अध्यक्ष फाल्गुन उके उपस्थित होते. सुरुवातीला पाहुण्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अ‍ॅड़ जायसवाल पुढे म्हणाले, समाजात एकता निर्माण करण्यासाठी प्रथम स्वत:च्या घरात एकता आणली पाहिजे. तसेच युवक -युवतींच्या परिचय मेळाव्यासह ज्यांचे जीवनसाथी वेगवेगळ््या कारणांमुळे दुरावले आहेत, अशा महिला व पुरुषांसाठीही परिचय मेळाव्यांचे आयोजन व्हावे, अशी त्यांनी यावेळी भावना व्यक्त केली. रवींद्र दुरुगकर यांनी युवक-युवती परिचय मेळाव्यांसह सामुहिक विविध सोहळ््यांचे सुद्धा आयोजन व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. सोबतच जेव्हापर्यंत कलार समाज हा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार नाही, तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नाही. त्यामुळे समाजाने आपल्या आर्थिक विकासाकडे लक्ष द्यावे, असे त्यांनी आवाहन केले. तसेच कलार समाज हा संपूर्ण देशभरात विखुरला असल्याचे त्यांनी स्पष्ट करू न त्या सर्व समाजाला एकजूट करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. या मेळाव्यात संपूर्ण राज्यातील शेकडो तरुण-तरुणी व त्यांच्या पालकांनी मोठ्या संख्येने भाग घेतला होता. संचालन अ‍ॅड. सुर्यकांत जायसवाल व ओमकार सुर्यवंशी यांनी केले. (प्रतिनिधी)