शहरं
Join us  
Trending Stories
1
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार ) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
2
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
3
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
4
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
5
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले
6
आजच्याच दिवशी झाली होती राज्यातील राजकीय उलथापालथींना सुरुवात, पाच वर्षांत काय काय घडलं?
7
‘मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला’, माजी मॉडेलचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सनसनाटी आरोप    
8
Amit Raj Thackeray Exclusive Interview: ...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरेंची पहिलीवहिली राजकीय मुलाखत
9
वडगाव शेरीत मोठा ट्विस्ट: महायुतीतील दोन्ही इच्छुकांना वरिष्ठांकडून शब्द, कोणाला मिळणार उमेदवारी?
10
विमानांना धमकी देणाऱ्यांवर कारवाईची तयारी, सरकारने META आणि 'एक्स'कडून डेटा मागवला
11
Amit Raj Thackeray Exclusive Interview: मी मुख्यमंत्री झालो तरी राज ठाकरेंचा मुलगाच असेन- अमित ठाकरे
12
"अभिजीत बिचुकले स्वयंभू, जनतेनं आता..."; साताऱ्यात छत्रपती शिवेंद्रराजेंविरोधात लढणार
13
PAK vs ENG : फिरकीच्या तालावर पाहुण्यांना नाचवले; फायनल कसोटीतही पाकिस्तानच्या 'गब्बर'ची कमाल
14
Maharashtra Assembly election 2024: महायुतीत पहिली बंडखोरी! आभा पांडे यांनी पुर्व नागपुरातून भरला अर्ज
15
Video - मित्रांसोबत हसत-खेळत गप्पा मारताना 'तो' खाली कोसळला; कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला 'मृत्यू'
16
NCP: अजित पवारांकडून आदेशाचे उल्लंघन, शरद पवार गटाने दिले पुरावे; सुप्रीम कोर्टाने दिला इशारा
17
माधुरी दीक्षित-विद्या बालनच्या नृत्याचा नजराणा! 'भूल भूलैय्या ३'मधील 'आमी जे तोमार' गाण्याची झलक
18
Vidhan Sabha Election 2024: लोकसभेला बसला फटका; आता 'तुतारी'चा वेगळ्या पद्धतीने प्रचार
19
धुळे शहर विधानसभेसाठी ठाकरेंचा शिलेदार ठरला, बड्या नेत्यानं शिवबंधन बांधत भगवा उचलला!
20
महायुतीच्या बंडखोरांवर अमित शाहांचे लक्ष; शिंदे-फडणवीस-पवारांना दिल्या विशेष सूचना...

समृद्धी महामार्गाचे काम अपूर्णच, तरीदेखील सरकारकडून होऊ शकते उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2022 7:00 AM

Nagpur News महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मोठमोठे दावे केले असले तरी प्रत्यक्षात समृद्धी द्रुतगती महामार्गाचा नागपूर-शिर्डी हा पहिला टप्पा फेब्रुवारीअखेर पूर्ण होणे कठीण आहे.

ठळक मुद्देपहिल्या टप्प्याचे काम महिनाअखेरीस होणे अशक्य मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्ग सुरू करण्याचा दबाव

आशिष रॉय

नागपूर : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मोठमोठे दावे केले असले तरी प्रत्यक्षात समृद्धी द्रुतगती महामार्गाचा नागपूर-शिर्डी हा पहिला टप्पा फेब्रुवारीअखेर पूर्ण होणे कठीण आहे. आता मे महिना ही नवीन ‘डेडलाईन’ ठरविण्यात आली आहे. दरम्यान, राज्यातील चौदा शहरांमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून या महिन्यातच अपूर्ण मार्गाचे उद्घाटन होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या ५२० किलोमीटरच्या पट्ट्यापैकी २२ कि.मी. मार्गाचे काँक्रिटीकरण शिल्लक आहे. जर फेब्रुवारीअखेरीस हा मार्ग वाहतुकीस खुला झाल्यास प्रवाशांना लांब वळसा घालून जावे लागेल, अशी माहिती महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक (अभियांत्रिकी) अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

प्रवासी नागपूर ते कारंजा लाड (२१० किमी) प्रवास करू शकतात. परंतु, त्यांना कारंजा लाड ते देऊळगाव राजा (३४१ किमी) हा प्रवास राष्ट्रीय महामार्गाने करावा लागेल. देऊळगाव राजा ते वैजापूर दरम्यानचा (४८८ किमी) मार्ग तयार आहे, पण पुन्हा वैजापूर ते शिर्डी हा प्रवास राष्ट्रीय महामार्गाने करावा लागेल. समृद्धी महामार्गाचे पहिला टप्पा मे महिन्याअखेरीसपर्यंत तयार होईल, असे गायकवाड यांनी सांगितले.

कारंजा लाड आणि देऊळगाव राजा दरम्यानच्या १५ कि.मी.च्या पट्ट्यातील काही पुलांचे बांधकाम अद्यापही सुरू आहे. वैजापूर आणि शिर्डी दरम्यान रेल्वे ओव्हरब्रिज आणि गोदावरी नदीवरील पूल मे अखेरपर्यंत पूर्ण होईल.

एमएसआरडीसीने डिसेंबर २०२१ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर ही मुदत फेब्रुवारी २०२२ व मे २०२२ अशी वाढविण्यात आली. मुंबईपर्यंतचा संपूर्ण महामार्ग डिसेंबर २०२२ च्या अगोदर पूर्ण होणार नाही. सततच्या विलंबामुळे येथील लोक प्रचंड अस्वस्थ झाले आहेत.

कोविडच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने आम्ही वेल्डिंग करू शकलो नाही. त्यामुळे कारंजा लाड ते देऊळगाव राजा दरम्यानच्या पुलाला विलंब झाला. गेल्या वर्षी मान्सून परतण्यास उशीर झाला आणि परिणामी वैजापूर ते शिर्डी दरम्यानच्या गोदावरी नदीतील पाण्याची पातळी सुरक्षित पातळीपर्यंत कमी होण्यास वेळ लागला. त्यामुळे पुलाच्या कामाला विलंब झाला. तसेच आरओबीसाठी भारतीय रेल्वेकडून अनेक परवानग्या मिळविण्यासाठी बराच विलंब लागला, असे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

मार्चपासून असा राहणार मार्ग

कारंजा लाड (२१० किमी) - समृद्धी द्रुतगती महामार्ग

कारंजा लाड - देऊळगाव राजा (१३१ किमी) - राष्ट्रीय महामार्ग

देऊळगाव राजा - वैजापूर (१४७ किमी) - समृद्धी द्रुतगती महामार्ग

वैजापूर - शिर्डी (३२ किमी) - राष्ट्रीय महामार्ग

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग