शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत मोठा भूकंप होण्याची शक्यता
2
मुख्यमंत्रिपदाबाबत बाळासाहेब थोरातांचं विधान; नाना पटोलेंच्या नावाला विरोध?
3
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?
4
IND vs BAN : मॅचनंतर बायकोनं टाकली 'गुगली'! प्रीतीनं अशी घेतली अश्विनची फिरकी (VIDEO)   
5
६ वर्षांच्या मुलीला माकडांनी बलात्काराची शिकार होण्यापासून वाचवले, जबरदस्ती करणाऱ्या इसमाला फटकावले
6
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
7
पडळकरांकडून सरकारविरोधातच आंदोलनाचं हत्यार; रास्ता रोकोसाठी धनगर समााजाला केलं महत्त्वाचं आवाहन 
8
रेखा झुनझुनवाला यांचे सुपरहिट स्टॉक्स, २०२४ मध्ये दिलाय ८९% परतावा; पाहा कोणते आहेत शेअर्स?
9
Maharashtra Assembly Elections : हरियाणा-काश्मीरनंतर आता महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल वाजणार! निवडणूक आयोगाने तयारी केली सुरू
10
Maharashtra Politics : शिवसेना शिंदे गटात पक्षातंर्गत वाद?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटानं उडाली खळबळ
11
सिनेट निवडणुकीत चुरस; शिंदेगटाच्या युवासेनेचे 'अभाविप'शी फाटले; पाठिंबा काढला
12
Pitru Paksha 2024: आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पितृपक्षातील अष्टमीला करा 'गजलक्ष्मी व्रत'!
13
महाविकास आघाडीत विदर्भ-मुंबईचा तिढा; मुंबईत उद्धवसेनेला २२, तर विदर्भात काँग्रेसला हव्या ४५ जागा
14
ATM Card वर मिळतो १० लाखांपर्यंतचा फ्री इन्शूरन्स; पाहा केव्हा घेता येतो या सुविधेचा लाभ?
15
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
17
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
18
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
19
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
20
सर्व्हे सांगतात, मविआला मुंबईत २२ जागा मिळणार

पदाधिकाऱ्यांनीच रोखली बोअरवेलची कामे !

By admin | Published: October 29, 2015 3:23 AM

उन्हाळ्याच्या दिवसात टंचाईग्रस्त गावातील लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी २०१४- १५ च्या टंचाई निवारण आराखड्याला प्रशासनाने मंजुरी दिली होती.

जिल्हा परिषद : जलव्यवस्थापन समितीच्या कामकाजावर प्रश्नचिन्हनागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात टंचाईग्रस्त गावातील लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी २०१४- १५ च्या टंचाई निवारण आराखड्याला प्रशासनाने मंजुरी दिली होती. ग्रामीण भागातील लोकांना पाणी मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या प्रयत्नाने ११६० बोअरवेल मंजूर करण्यात आल्या होत्या. परंतु पदाधिकाऱ्यांनी ही कामे रोखल्याने ४८२ कामे झाली नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. पदाधिकारीच विकास कामात आडकाठी आणत असल्याने जिल्ह्याचा विकास कसा होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील अनेक गावात उन्हाळ्याच्या दिवसात पाणीटंचाई निर्माण होते. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. या संकटावर मात करण्यासाठी टंचाई निवारण आराखडा तयार केला जातो. शासनाकडून यासाठी निधी उपलब्ध केला जातो. गेल्या वर्षी जिल्ह्यतील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा. यासाठी ११६० बोअरवेल मंजूर करण्यात आल्या यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करण्यात आला. पाणीपुरवठा विभागाने यासाठी नियोजन केले होते. बोअरवेलची कामे युद्धपातळीवर सुरु केली. मोठ्या प्रमाणात कामे होत असताना पदाधिकाऱ्यांनीच यात आडकाठी आणली. त्यामुळे मंजूर असूनही ४८२ कामे करता आली नाही. पदाधिकाऱ्यांना विकास कामे नको का असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात व जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता असल्याने तक्रार करूनही उपयोग नसल्याने अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे. काही अधिकारी इतरत्र बदली करण्याच्या प्रयत्नात असल्याची जि.प.मध्ये चर्चा आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील मामा तलाव व सिंचन तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असल्याने सिंचन क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या तलावांचा सिंचनासाठी उपयोग होत नाही. समितीच्या बैठकीत ही बाब निदर्शनास आणल्यानंतरही कार्यवाही होत नाही. बैठकीत घेण्यात आलेले ठराव जिल्हा नियोजन समितीकडे पाठविले जात नाही. तसेच वृक्षारोपण मोहीम राबविताना सार्वजनिक ठिकाणी झाडे न लावता शेतकऱ्यांच्या बांधावर लावल्यास झाडे जगतील. शेतकऱ्यांना फळझाडापासून उत्पन्न मिळेल असा प्रस्ताव सदस्यांनी मांडला होता. परंतु या प्रस्तावाचा विचार करण्यात आला नाही, अशी व्यथा काही सदस्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)