शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
5
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
6
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
7
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
8
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
9
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
10
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
11
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
12
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
13
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
14
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
15
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
16
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
17
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
18
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
19
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
20
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक

जागतिक वन्यजीव दिवस विशेष; २०० वर वाघांचा शिकाऱ्यांनी घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2022 7:00 AM

Nagpur News २०१२ ते २०२० या आठ वर्षांत ८५७ पैकी १९३ वाघ शिकारीत मारले गेले आणि मागील दाेन वर्षांत त्यात भर पडली आहे.

ठळक मुद्देव्याघ्र प्रकल्पात ५५ टक्के मृत्यू

निशांत वानखेडे

नागपूर : मागील काही वर्षांत वाघांची संख्या वाढण्यासह व्याघ्र शिकारीवर नियंत्रण मिळविण्यात वन विभागाला बऱ्यापैकी यश आले आहे. मात्र, मागील १० वर्षांचे आकडे पाहता २०० च्यावर वाघांचे बळी शिकाऱ्यांनी घेतले आहेत. २०१२ ते २०२० या आठ वर्षांत ८५७ पैकी १९३ वाघ शिकारीत मारले गेले आणि मागील दाेन वर्षांत त्यात भर पडली आहे. भारतात वन्यजीवांच्या निसर्गचक्रात वाघ हा प्रमुख घटक असल्याने त्याचे महत्त्व कायम अधाेरेखित हाेत आले आहे.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए) च्या आकडेवारीनुसार २०१२ ते २०२२ दरम्यान वेगवेगळ्या कारणांनी १००८ वाघांचा मृत्यू झाला. २०२० पर्यंत ४१७ वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला. विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने या काळात १०८ वाघांचा बळी गेला. ४४ अनैसर्गिक तर ७३ वाघ उपचारादरम्यान मृत पावले. २०२० पर्यंत व्याघ्र प्रकल्पाच्या आत ४७८ म्हणजे ५५.७८ टक्के वाघांचा जीव गेला. व्याघ्र प्रकल्पाबाहेर २७१ म्हणजे ३१.६२ टक्के, तर १२.६० टक्के विजेच्या धक्क्याचे बळी ठरले. एकूण मृत्यूंपैकी ८८.९१ टक्के प्रकरणे शवविच्छेदन व फाॅरेन्सिक अहवालानंतर बंद करण्यात आली असून, ११.०९ टक्के प्रकरणे प्रलंबित असल्याचा एनटीसीएचा अहवाल आहे.

महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर

२०१२ ते २०२२ पर्यंत दहा वर्षांत झालेल्या मृत्यूंमध्ये सर्वाधिक २५० व्याघ्र मृत्यू मध्य प्रदेशात झाले. त्यापाठाेपाठ १७४ मृत्यूंसह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक वाघ या दाेन राज्यांतच आहेत, हेही विशेष. त्यानंतर कर्नाटक १२७, उत्तराखंड ९३, तामिळनाडू ६२ व आसाम ६० या राज्यांचा क्रमांक लागताे.

२०२२ च्या दाेन महिन्यांत २४ मृत्यू

२०२१ साली देशभरात १२७ वाघ मरण पावले हाेते. त्यापैकी ४२ मध्य प्रदेश व २७ महाराष्ट्रात हाेते. २०२२ मध्ये आतापर्यंत दाेन महिन्यांत २४ वाघांचे मृत्यू झाले. यात दाेन्ही राज्यात प्रत्येकी ६ बळी गेले. क्षेत्रनिहाय आकडेवारीनुसार ताडाेबा अंधारी प्रकल्पात आठ वर्षांत १८ मृत्यू, पेंच महाराष्ट्रात १२, मेळघाटात ११ व नवेगाव नागझिरा अभयारण्यात २ मृत्यूची नाेंद आहे.

टॅग्स :Tigerवाघwildlifeवन्यजीव