शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
2
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
3
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
4
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
5
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
6
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
7
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप
8
कुणीही कितीही काहीही केले तरी लाडकी बहिण योजना बंद होणार नाही, CM शिंदेंचा जनतेला विश्वास
9
सर्वाधिक मताधिक्याने जिंकलेल्या अपक्ष आमदाराला महायुती, मविआत प्रवेश बंदी, काय घडलं?
10
IND vs NZ : कॅप्टन Tom Latham ची बॅट तळपली; न्यूझीलंडनं घेतलीये ३०१ धावांची आघाडी
11
दिल्लीत जाताच मविआचा फॉर्म्युला बदलला; ठाकरे सेनेच्या जागा ९० झाल्या, थोरात म्हणाले...
12
काय सांगता? महिन्याला १ लाख रुपये कमवतात भिकारी; स्मार्टफोनसह पॅनकार्डचाही करतात वापर
13
Maharashtra Assembly 2024: मेघना बोर्डीकर विरुद्ध विजय भांबळे; जिंतूरमध्ये राजकीय गणित कसं?
14
पुण्यात पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचं सोनं पकडलं; सोनं आलं कुठून? तपास सुरु...
15
Sonu Sood : "आपला देश सुरक्षित"; बॉलिवूडवरील गँगस्टरच्या दहशतीवर सोनू सूद रोखठोक बोलला!
16
कोकणात मविआमध्ये बंडखोरी, सावंतवाडीत अर्चना घारे-परब यांनी भरला उमेदवारी अर्ज
17
नाशिक शहरात एकही जागा काँग्रेसला नाही; इच्छुक ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात अपक्ष लढणार
18
रोहितच्या नावे लाजिरवाणा विक्रम; धोनी-विराटच्या कॅप्टन्सीत असं कधीच नाही घडलं
19
दलित वसाहतीला आग लावणाऱ्या 101 जणांना न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा...
20
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अदानी-अंबानींच्या कंपन्यांनाही टाकलंय मागे

संत्रा बागेचे ओलित करणे जीवावर बेतले; विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 4:38 PM

बेलाेना शिवारातील घटना

बेलाेना (नागपूर) : संत्रा बागेचे ओलित करताना शेतातील इलेक्ट्रिक माेटरपंप वारंवार बंद पडायचा. त्यामुळे तरुणाचे पेटीतील वीजप्रवाह तपासून पाहायला सुरुवात केली आणि त्याला जाेरात विजेचा धक्का लागला. त्यातच त्याचा मृत्यू झाला असून, ही घटना नरखेड पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील बेलाेना शिवारात शुक्रवारी (दि. २४) दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली.

युगल गजानन बारमासे (१७, रा. बेलोना, ता. नरखेड) असे मृताचे नाव आहे. युगल त्याच्या आई व आजीसाेबत शेतात संत्र्याच्या बागेचे ओलित करण्यासाठी गेला हाेता. माेटरपंप सतत बंद हाेत असल्याने त्याने नेहमीप्रमाणे पेटीतील वीजप्रवाह तपासायला सुरुवात केली. त्यातच त्याला जाेरात विजेचा धक्का लागला. ही बाब लक्षात येताच शेजारच्या शेतकऱ्यांनी विहिरीच्या दिशेने धाव घेतली. ताेपर्यंत त्याचा मृत्यू झाला हाेता.

माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक महेश बोथले, महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अभिजित घोडे, शाखा अभियंता सलीम शेख यांनी घटनास्थळ गाठले. पाेलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नरखेड येथील ग्रामीण रुग्णालयात नेला. याप्रकरणी नरखेड पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

विजेच्या कमी-अधिक दाबाला जबाबदार काेण?

युगल हा त्याच्या आईवडिलांना एकुलता एक मुलगा हाेता. त्याला तीन बहिणी आहेत. ताे धार्मिक प्रवृत्तीचा हाेता. कृषिपंपांना दिली जाणारी वीज कमी दाबाची असते. त्यातच माेठ्या प्रमाणात भारनियमन केले जात असून, दिवसा वीजपुरवठा सुरळीत असल्यास बागा व पीक जगवण्यासाठी शेतकरी जीवाचा आटापिटा करतात. कृषिपंपाला पूर्ण दाबाच्या विजेचा पुरवठा केला असता तर माेटरपंप बंद झाला नसता. शिवाय, युगलचा जीव गेला नसता. त्यामुळे या घटनेची जबाबदारी स्वीकारणार काेण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर