शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
3
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
4
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
5
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?
6
कॅनडातील भीषण वास्तव; वेटरच्या नोकरीसाठी सुशिक्षित भारतीयांनी लावल्या रांगा...
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाह प्रमुख हाशिम सफीद्दीनचा खात्मा, आता फक्त एकच जिवंत...
8
पाकिस्तानी हिंदू विद्वानानं झाकीर नाईकला आरसा दाखवला; कट्टरपंथी मानसिकतेवर बोचरा प्रश्न विचारला अन्...
9
हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Women’s T20 World Cup : कोडं सुटलं; पण Harmanpreet Kaur समोर उभं राहिलं मोठं चॅलेंज
11
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
12
इराणमध्ये मोसादची भीती! अयातुल्ला खामेनेईंचा आता कोणावरही विश्वास नाही, स्वतःच्या सैन्याची सुरू केली चौकशी 
13
गरब्याची रंगत वाढणार! मुंबईत नवरात्रीचे शेवटचे तीन दिवस लाऊडस्पीकरला रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी
14
सोन्याची किंमत होती 99 रुपये तोळा, 77000 रुपयांपर्यंत कशी पोहोचली?
15
लक्ष्यभेद करणारा डोळा अन् चक्रव्यूह! 'बिग बॉस मराठी'ची चमचमती ट्रॉफी, टॉप ६ सदस्य पाहतच राहिले
16
"'ते' एक वाक्य अन् तुम्ही माझ्या करिअरचं वाटोळं केलं"; पंकजा मुंडेंनी हसत हसत हातच जोडले
17
आजोबांनी नातीसाठी फुगा आणला पण तोच जीवावर बेतला; डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण
18
"इस्रायलला इशारा, अरब मुस्लिमांकडे मागितली साथ...; खामेनेईंच्या भाषणातील हे 10 मुद्दे आहेत खास
19
चार महिन्यांपासून पाकिस्तानच्या खेळाडूंचा पगार रखडला; आता PCB ने केली सारवासारव
20
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड

अतिवृष्टीची कंपनीकडून महिनाभराने पाहणी, शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान अन् घेऊन आले १२ नावे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 7:36 PM

अतिवृष्टीच्या पाहणीची कंपनीला महिनाभराने जाग; दोन हजार शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत पोर्टलवर ऑनलाइन नोंदी केल्या असताना १२ शेतकऱ्यांची नावे कशी, अशी प्रश्नांची सरबत्ती कर्मचाऱ्यांवर केली.

- गोविंद शिंदेबारूळ (ता. कंधार) : कंधार तालुक्यातील बारूळ, मजरे वरवंट शिवारात १ आणि २ सप्टेंबर असे सलग दोन दिवस अतिवृष्टीमुळे परिसरातील जवळपास दोन हजार शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, सोयाबीन, मूग, उडीद पिकाचे मातेरं झाले होते. शासनाच्या निर्देशानुसार ७२ तासांच्या आत १९४७ शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे ऑनलाइन तक्रारी नोंदविल्या; परंतु त्याच्या तब्बल २६ दिवसांनंतर पीक विमा कंपनीला या गावात नुकसानीची पाहणी करण्याची जाग आली. त्यानंतर सोमवारी गावात आलेल्या पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी फक्त १२ शेतकऱ्यांच्या नावाची यादी घेऊन आल्याने शेतकरी संतप्त झाले. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गावातून काढता पाय घ्यावा लागला.

जिल्ह्यात १ आणि २ सप्टेंबरला अनेक मंडळांत अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. शासनाने नुकसानीची माहिती पीक विमा कंपनीला ७२ तासांच्या आत कळवावे, असे बंधन टाकले. त्यानुसार बारूळ परिसरातील १९४७ शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे ऑनलाइन नोंदी केल्या. एक ते दोन दिवसांत पीक विमा कंपनीचे कर्मचारी गावात नुकसानीची पाहणी करण्यासाठी येतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; परंतु तब्बल २६ दिवसांनंतर पीक विमा कंपनीचे कर्मचारी गावात प्रकटले. त्यामुळे महिनाभरानंतर आता शेतातील अतिवृष्टीची काय पाहणी करणार? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. यावेळी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आपल्यासोबत केवळ १२ शेतकऱ्यांच्या नावाची यादी आणली होती. कंपनीकडून या १२ शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर मात्र शेतकऱ्यांचा पारा चांगलाच चढला.

दोन हजार शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत पोर्टलवर ऑनलाइन नोंदी केल्या असताना १२ शेतकऱ्यांची नावे कशी, अशी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीने पीक विमा कर्मचाऱ्यांना सरसकट सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे निवेदन देण्यात आले. दरम्यान, पीक विमा कंपनीच्या महिनाभरानंतर उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार म्हणजे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखेच आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाNandedनांदेडAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी