शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

हलगर्जीपणाचा बळी; वादळात पडलेले पोल शेतात तसेच, विद्युतवाहिनीच्या स्पर्शाने महिलेचा मृत्यू

By श्रीनिवास भोसले | Published: March 20, 2023 2:02 PM

महावितरणच्या हलगर्जीपणाचा बळी; वादळात पडलेले पोल ५ दिवसानंतरही तसेच 

नांदेड : गुरुवारी झालेल्या वादळी वाऱ्यात पडलेले विजेचे पोल तसेच ट्रांसफार्मर दुरुस्तीसाठी पाच दिवसानंतरही मुहूर्त सापडला नाही. या तुटलेल्या तारांतून विद्युत प्रवाह सुरू असल्याने शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना मुदखेड तालुक्यातील बारड येथे घडली आहे.

धुरपातबाई पिराजी रापाणवाड (वय ५५)  रा. इंदिरा नगर बारड असे शॉक लागून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. सदर महिला चारा घेण्यासाठी गेली असता अचानकपणे तुटलेल्या तारात विद्युतपुरवठा होऊन महिलेला शॉक बसला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. चार दिवसांपासून वीजपुरवठा खंडित आहे. सोमवारी अचानक वीज टाकली असता ही घटना घडली. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची देखभाल दुरुस्ती अथवा पाहणी न करताच वीजपुरवठा सुरू केल्याने हा अपघात घडला आहे. त्यामूळे सदर अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

गुरुवारी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजा मेटाकुटीला आला आहे. अवकाळी पश्चात विविध समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. दरम्यान अतिवृष्टीत वादळ वाऱ्यामुळे पडलेले पोल रोहित्र दुरुस्त करण्याच्या कामाला दिरंगाई होत आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीNandedनांदेडagricultureशेतीRainपाऊस