शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
2
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
3
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान
4
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
5
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
6
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
7
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
8
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
9
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
10
वांद्रे पश्चिम मतदारसंघातून विधानसभेसाठी प्रिया दत्त? आशिष शेलारांविरोधात काँग्रेसची नवी खेळी
11
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार
12
"आधी म्हणत होते अक्षय शिंदेला फाशी द्या, आता...", अजित पवार 'मविआ'वर बरसले
13
Amazon Great Indian Festival Sale मध्ये 15 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतील 'हे' स्मार्टफोन
14
Exclusive: 'निक्कीला छत्रपती संभाजीनगरला घेऊन जाणार'; अरबाज म्हणतो, 'दोघांचंही बालपण...'
15
बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून...
16
वेड्या बहिणीची वेडी ही माया! भाऊ अर्जुन तेंडुलकरच्या वाढदिवशी बहीण सारा भावुक, म्हणाली...
17
आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात सरकार स्थापन होऊ शकणार नाही, अरविंद केजरीवाल यांचा दावा 
18
'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी
19
भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी
20
दुधाच्या अनुदान वाढीवरून अजित पवार आणि विखे पाटलांमध्ये खडाजंगी; बैठकीत नेमकं काय घडलं?

अजूनही आधार जोडलेच नाही; आता सोळावा हप्ता शेतकऱ्यांच्या हातचा जाणार!

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: February 06, 2024 7:03 PM

पीएम किसान, नमो पेन्शन योजना, आधार संलग्न केलेच नाही, १५,७९१ शेतकरी १६ व्या हप्त्याला मुकणार

नांदेड : किसान पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांना ई-केवायसी, आधार प्रमाणीकरण, आधार लिंक या गोष्टींची पूर्तता करण्यासाठी शासनाने दीड वर्षाचा कालावधी दिला होता. आजपर्यंत जिल्ह्यातील १५ हजार ७९१ शेतकऱ्यांनी आधार संलग्न केले नसल्याने सदर शेतकरी केंद्र शासनाच्या पीएम किसानच्या १६ व्या हप्त्याला मुकावे लागणार आहे. शासनाकडून याबाबत वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष केल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला.

जिल्ह्यात पीएम किसान योजनेसाठी ३ लाख ८७ हजार १५७ इतकी पात्र शेतकऱ्यांची संख्या आहे. त्यापैकी ५ फेब्रुवारीपर्यंत ३ लाख ८४ हजार ३१२ शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. याचे प्रमाण ९९ टक्के इतके आहे; पण ई-केवायसी केल्यानंतर ३ लाख ७१ हजार ३६६ शेतकऱ्यांनीच आधार संलग्न केले आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या पीएम किसानसह राज्य सरकारच्या नमो पेन्शन योजनेपासून वंचित राहावे लागणार आहे.

देशातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने पाच वर्षांपूर्वी पी.एम. किसान सन्मान योजना सुरू केली आहे. यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला महिन्याला पाचशे रुपये असे चार महिन्यांचे दोन हजार रुपये वर्षाला तीन टप्प्यात दिले जातात, तर राज्य सरकारने नमो पेन्शन योजना सुरू केली आहे. या योजनेतही चार महिन्यांचे दोन हजार याप्रमाणे सहा हजार रुपये पेन्शन शेतकऱ्यांना दिली जात आहे; पण ई-केवायसी करूनही आधार संलग्नीकरण न केल्याने जिल्ह्यातील १५ हजारांपेक्षा अधिक शेतकरी या योजनांपासून वंचित राहणार आहेत.

ई-केवायसी प्रलंबित असलेले शेतकरीजिल्ह्यात ९९ टक्के ई-केवायसीचे काम पूर्ण झाले असून केवळ एक टक्के शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही. ई-केवायसी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांची संख्या २८४५ इतकी आहे.

१६ व्या हप्त्यापासून वंचित राहणारे शेतकरीआधार संलग्नीकरण न केल्याने केंद्र शासनाच्या पीएम किसानच्या १६ व्या हप्त्यापासून, तसेच राज्य शासनाच्या नमो पेन्शन योजनेपासून १५ हजार ७९१ शेतकरी वंचित राहणार आहेत.

तालुकानिहाय शेतकरी संख्याई-केवायसी प्रलंबित असलेले तालुकानिहाय शेतकरी असे- अर्धापूर १२१, भोकर ११४, बिलोली १६२, देगलूर १७, धर्माबाद १३७, हदगाव ३७८, हिमायतनगर ९१०, कंधार ८७, किनवट १९१, लोहा २५४, माहूर ७२, मुखेड ७९, मुदखेड २१७, नायगाव २, नांदेड ४९, तर उमरी तालुक्यात ५५ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित आहे.

या महिन्यात मिळणार १६ वा हप्ताशेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान योजनेचा १६ वा हप्ता फेब्रुवारी महिन्यात मिळणार आहे. याशिवाय जे शेतकरी पीएम किसानसाठी पात्र आहेत, अशा शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या नमो पेन्शन योजनेचाही लाभ मिळेल. सदर योजनेसाठी महसूल विभागाकडून लँड फिडिंगचे काम केले जाते, तर ग्रामविकास विभागाकडून मयत लाभार्थ्यांची माहिती कृषी विभागाकडे दिली जाते, तर ही योजनेची कृषी विभागाकडून अंमलबजावणी केली जात आहे.

पोस्ट ऑफिसमध्ये खाते काढावेशेतकऱ्यांनी आधार फिडिंग केवायसी डीबीटी अकाउंट काढून घ्यावे, अन्यथा लाभापासून वंचित राहावे लागेल. शक्यतोवर पोस्ट ऑफिसमध्ये खाते काढावे.- भाऊसाहेब बरहाटे, जिल्हा कृषी अधीक्षक, नांदेड.

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र