शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
2
अक्षय शिंदेला गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
3
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
4
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
5
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
6
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
7
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
8
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
9
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा
10
दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव
11
Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक
12
नकळतच सारे घडलं; "मला माफ करा!" १२ वर्षांपूर्वीच्या फोटोमुळं अशी फसली इंग्लंडची कॅप्टन
13
Video - २ लाख देऊन IPS झालेल्या मिथिलेशचं नवं स्वप्न; आता व्हायचंय डॉक्टर, 'हे' आहे कारण
14
जबरदस्त! अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार; BSNL'चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन ५२ चालणार
15
अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा
16
Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड!
17
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
18
Northern Arc Capital IPO Listing: दमदार लिस्टिंगनं पैशांचा पाऊस, प्रत्येक शेअरवर किती झाला गुंतवणूकदारांना फायदा?
19
Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया
20
तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व

पाच महिन्यांनंतर कारखान्यांचे बॉयलर झाले थंड, उसतोडणी उशिरा झाल्याने शेतकऱ्यांना फटका

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Published: April 04, 2024 5:37 PM

चार जिल्ह्यांतील ऊस गाळप संपले, १ कोटी १९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

नांदेड : नांदेड विभागात ५ ते १० नोव्हेंबरपासून सुरू झालेले सहकारी व खासगी अशा नांदेड, परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतील २९ साखर कारखान्यांचे बॉयलर अखेर पाच महिन्यांनंतर थंड झाले आहे. ऊसगाळप संपले असून, मार्च महिन्याअखेरीस सर्व कारखान्यांनी १ कोटी १७ लाख १२ हजार ६५३ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. त्यातून १ कोटी १९ लाख ८३,१०५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.

नांदेड विभागासह मराठवाडा तसेच राज्यातील बहुतांश साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम जवळपास संपलेला आहे. त्यामुळे नांदेड सहसंचालक कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील कारखान्यांचे बॉयलर बंद झालेले आहेत. गेल्या वर्षी नांदेड विभागात उसाची लागवड उशिराने झाली होती. तसेच तोडणीवेळी अवकाळी पाऊस बरसल्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस शिल्लक राहिल्याने यंदा मार्चअखेरपर्यंत कारखाने सुरू राहिले. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे ऊसतोडणीसाठी शेतात वाहने जात नसल्याने अडचणी आल्या होत्या. त्यामुळे ऊस गाळप सुरू होण्यास बराच विलंब झाला होता. यामुळे शेतातील ऊस बरेच दिवस पडून राहिल्याने शेतकऱ्यांची ओरड सुरू राहिली. तोडणीला येऊनही अनेक दिवस ऊस शेतातच राहिल्याने त्याचा एकरी उत्पादनावर परिणाम झाला. एकरी ४० टन ऊस व्हायचा तिथे २५ ते ३० टनावर उतारा आला.

लातुरमध्ये सर्वाधिक ४९ लाख मे.टन ऊस गाळप२०२३-२४ या हंगामात लातूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सर्वाधिक ४९ लाख ५ हजार ९५४ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. तर त्यातून ५२ लाख २२ हजार ९३० क्विंटल साखरेचे उत्पादन हाती आले आहे. त्यापाठोपाठ नांदेड जिल्ह्यातील १९ लाख ४१ हजार ९३७ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून, १९ लाख ३२ हजार ६३५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले. तर परभणी जिल्ह्यातील सात खासगी साखर कारखान्यांनी ३३ लाख ३५ हजार ५४५ मेट्रिक टन उसाचे गाळप झाले असून, ३३ लाख ६८४० क्विंटल साखरेचे उत्पादन निघाले आहे. तर हिंगोली जिल्ह्यातील पाच कारखान्यांनी १५ लाख २९ हजार २१८ मेट्रिक टन उसाचे गाळप केले असून त्यातून १५ लाख २० हजार ७०० क्विंटल साखरेचे उत्पादन निघाले आहे.

शेतकऱ्यांना आर्थिक फटकाजिल्ह्यात यंदा ऊसलागवड जास्त आणि गाळप उशिराने सुरू झाल्याने अनेक शेतकऱ्यांचा ऊस अनेक दिवस तोडणीअभावी शेतातच शिल्लक राहिला होता. काही शेतकऱ्यांनी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात लागवड केलेल्या उसाची तोडणी पंधरा ते सोळा महिन्यांनंतर झाली. त्यामुळे उसाच्या वजनामध्ये मोठी घट झाल्याने त्याचा शेतकऱ्यांना फटका मोठा आर्थिक फटका बसला आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेNandedनांदेड