शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
2
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
3
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
4
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
5
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
6
"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली
7
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
8
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
9
आफ्रिकेतील बोत्स्वानातून आणणार आणखी ८ चित्ते; पुढील महिन्यापर्यंत ४ चित्ते दाखल होण्याची शक्यता
10
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
11
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
12
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
14
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
15
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
16
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
17
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
18
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
19
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
20
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना

शेती तर पाहिजे, मग शेतीत करिअर का नाही? कृषी अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांची पाठ

By राजेश निस्ताने | Updated: August 2, 2024 08:46 IST

राजेश निस्ताने, लोकमत न्यूज नेटवर्क, नांदेड : शेतकरी विविध समस्यांचा परिणाम शेतीवरच नव्हे तर कृषी अभ्यासक्रमांवरही होऊ लागला आहे. ...

राजेश निस्ताने, लोकमत न्यूज नेटवर्क, नांदेड : शेतकरी विविध समस्यांचा परिणाम शेतीवरच नव्हे तर कृषी अभ्यासक्रमांवरही होऊ लागला आहे. यंदा कृषी अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. हा शेतीच्या दुरवस्थेचा परिणाम मानला जात आहे.  

राज्यात परभणी, अकोला, राहुरी व दापोली येथील कृषी विद्यापीठांतर्गत एकूण १७४ कृषी महाविद्यालये असून, तेथील विद्यार्थिक्षमता १७ हजार ९०६ एवढी आहे; परंतु, या वर्षी प्रवेशासाठी तीन वेळा मुदतवाढ देऊनही विद्यार्थ्यांचा म्हणावा तेवढा प्रतिसाद लाभलेला नाही. 

शेतीत उज्ज्वल भविष्य नाही?  

कृषी अभ्यासक्रमात ८० टक्के विद्यार्थी हे शेतकरी, शेतमजुरांची मुले किंवा शेतीवर अवलंबून असणारे असतात. मात्र, त्यांना शेतीत स्वत:चे उज्ज्वल भविष्य दिसत नाही. त्यातच संशोधक, प्राध्यापक, ग्रामसेवक, कृषिसेवक भरती नसल्याने उदासीनता आहे. त्यामुळेच की काय, शेती व कृषी क्षेत्राशी निगडित अभ्यासक्रमावरही अवकळा आली आहे. 

...ही कारणेही महत्त्वाची

शासकीय कृषी महाविद्यालयांत सोयीसुविधांचा अभाव आणि अनेक जागा रिक्त. खासगी महाविद्यालयात पूर्ण पगार मिळत नसल्याने तेवढ्या गुणवत्तेचे प्राध्यापक नाहीत. निसर्गाचा लहरीपणा, शेती खर्च, उत्पादन घट, भाव न मिळणे, महागाई, मजूर टंचाई अशा कारणांनी शेतकरी त्रस्त आहे. त्यातूनच शेती विकणे, पडीक राहणे असे प्रकार घडतात. ही अवस्था पाहून शेतकऱ्याचा मुलगा शेतकरी होण्यास तयार नाही.  

अशी मिळाली मुदतवाढ 

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : १५ जुलै २०२४ पहिली मुदतवाढ : २२ जुलै दुसरी मुदतवाढ : २८ जुलैतिसरी मुदतवाढ : ३१ जुलै. 

टॅग्स :Educationशिक्षणAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेती