शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
2
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
3
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
4
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
5
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
6
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
7
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
8
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
9
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
10
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
11
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
12
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
13
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
14
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
15
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
16
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
17
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
18
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
19
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

कोरोना रुग्ण संख्येबरोबर लस घेणाऱ्यांची संख्याही रोडावत चालली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 4:25 AM

नायगाव बाजार- तालुक्यातील कोरोनाची साथ रोखण्यासाठी व बाधित रुग्णसंख्येचा आकडा कमी करण्यासाठी शासनाच्या सूचनेप्रमाणे सर्वच विभागाचे अधिकारी-कर्मचारी व ...

नायगाव बाजार- तालुक्यातील कोरोनाची साथ रोखण्यासाठी व बाधित रुग्णसंख्येचा आकडा कमी करण्यासाठी शासनाच्या सूचनेप्रमाणे सर्वच विभागाचे अधिकारी-कर्मचारी व जनतेच्या सहकार्यामुळे ही साथ आटोक्यात आली आणि बाधितांची संख्या कमी झाली. हे जरी बरोबर असले तरी जेव्हा रोजच्या रोज या संसर्ग रोगाने बाधित झालेल्यांची संख्या व मृत्यूचे आकडे वाढत होते तेव्हा लोक लसीकरण केंद्रावर रांगा लावून लस टोचून घेत होते. ती मिळत नसेल तर त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालीत असत. केंद्रावरील कर्मचारी जीव मुठीत धरून काम करत असत. वेळप्रसंगी त्या ठिकाणी पोलिसांना देखील पाचारण करावे लागे. अशी परिस्थिती निर्माण होत होती. अनेक उपाययोजने बरोबर झालेल्या लसीकरणामुळे बाधित रुग्णसंख्येचा आलेख कमी होऊन तो महिन्याकाठी एका अंकावर आला. नोंदीनुसार २८ ऑगस्टपासून तो निरंक आहे. लसीकरणामुळे बाधितांचा आकडा कमी होत असला तरी लस न घेतलेल्यांची संख्या काही कमी नाही परंतु हे लोक केंद्रावर जाऊन लस टोचून घेत नाहीत. त्यामुळे केंद्रावर लस घेणाऱ्याची संख्या कमी होत आहे. कारण कोरोना संपला या भ्रमात ते वावरत असावेत.

तालुक्यात लसीकरणासाठी ग्रामीण रुग्णालय नायगाव बाजार, प्राथमिक आरोग्य केंद्र बडबडा, कुंटूर, मांजरम व उपकेंद्र नर्सी, शेळगाव गौरी, मुगाव, टेंभुर्णी, होटाळा, गडगा, कोलंबी, राहेर, ईकळीमोर, सुजलेगाव, रातोळी, सांगवी, घुंगराळा, देगाव, कहाळा, कुष्णूर, सोमठाणा, रुई, अंतरगाव आदी ठिकाणी व्यवस्था केली. शहरांमध्ये वाॅर्ड वाईस फेरी मारून लसीकरण करण्याची व्यवस्था ग्रा. रु.च्या वैद्यकीय अधीक्षकांनी केली. या सर्व केंद्रावर आरोग्य विभागाने लस उपलब्ध करून दिलेली आहे. केंद्रावर मुबलक अशी लस उपलब्ध असताना देखील ते घेणाऱ्यांची संख्या मात्र कमी आहे. तालुक्यात ३६ टक्के लसीकरण झाले आहे.

यावर्षी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कडधान्यातील मुगाचा पेरा १५७१ हेक्टरमध्ये केला. ज्यात नायगाव मंडळात २६४ हेक्टर, नरसी मंडळात ३०४ हेक्टर, कुंटूर मंडळात २८५ हेक्टर, बरबडा मंडळात ३९८ हेक्टर, मांजरम मंडळात ३२० हेक्टर आहे. प्रारंभी निसर्गाने साथ दिल्याने मुगाचे पीक चांगले होते परंतु जुलै आणि ऑगस्ट महिन्यात सलग २२ दिवस पाऊस झाला नसल्याने उत्पादनात घट झाली असली तरी इतर पिकात त्याची उणीव भरून निघेल या आशेवर शेतकरी असताना ६ व ७ सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस झाला. याची नोंद १२९ मि. मी.अशी झाली.या पावसामुळे इतर पिकांचे बरेच नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यावर पुन्हा आर्थिक संकट ओढवले आहे.