शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

नापिकी, कर्जबाजारीपणाने नैराश्य; गुढी पाडव्यादिवशीच शेतकऱ्याने संपवले जीवन

By हितेंद्र.सिताराम.काळुंखे | Published: March 22, 2023 7:18 PM

शेतातील सततची नापिकी, उत्पन्नाची हमी नाही, निसर्गाचा लहरीपणा यामुळे आपण जीवन कसे जगायचे?

मारतळा (जि. नांदेड) : लोहा तालुक्यातील हातणी येथील एका अल्पभूधारक तरुण शेतकऱ्याने सततची नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आपल्या शेतात गळफास घेऊन जीवन यात्रा संपविली. ही दुर्घटना २२ मार्च रोजी गुढी पाडव्यादिवशी सकाळी घडली.

हातणी (ता. लोहा) येथील अल्पभूधारक शेतकरी गणेश दादाराव कदम (वय २८) याने सततची नापिकी झाल्याने कर्ज कसे फेडायचे, या चिंतेतून आपल्या शेतातील बांधावर असलेल्या लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली.

उस्माननगर पोलिसांना ही माहिती मिळताच फौजदार प्रभू केंद्रे, जमादार राम कानगुले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात पाठविला.

गणेशच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेमुळे कदम परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास उस्मान नगर पोलिस करीत आहेत.

एक वर्षापूर्वीच झाले लग्नमृत गणेश याचे एक वर्षापूर्वीच लग्न झाले होते. त्याच्या नावे तीन एकर शेती असून, त्याच्यावर बँकेचे पीक कर्ज होते. त्यातच तो थकबाकीदार झाला. शेतातील सततची नापिकी, उत्पन्नाची हमी नाही, निसर्गाचा लहरीपणा यामुळे आपण जीवन कसे जगायचे? या विवंचनेने या तरुण शेतकऱ्याने आपली जीवन यात्रा संपविली.

टॅग्स :Nandedनांदेडfarmer suicideशेतकरी आत्महत्या