शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
2
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
3
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
4
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
5
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
6
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
7
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
8
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
9
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
10
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
12
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
13
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
14
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
15
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
16
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
17
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
18
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

BharatJodoYatra: घाबरलेल्या भाजपकडून आमचे सोशल मिडिया अकाऊंट बंद करण्याचा प्रयत्न

By शिवराज बिचेवार | Published: November 09, 2022 12:13 PM

ही चुनाव जितो यात्रा नाही, परंतू यात्रेमुळे काँग्रेसला संजीवनी

नांदेड- येणाऱ्या निवडणुकीत या यात्रेचे काय परिणाम होतील याचा आम्ही विचार करीत नाही. तो येणारा काळ ठरवेल. परंतु एवढे मात्र नक्की या यात्रेमुळे भाजप मात्र घाबरली आहे, त्यामुळेच दररोज टी शर्ट कोणते घातले?, काय जेवण केले? यावरून टीका करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमचे सोशल मिडिया अकाऊंट बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला, असा आरोप माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी केला. 

भारत जोडो यात्रा नायगाव येथे पोहचल्यानंतर रमेश यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मोदी यांनी कोणताही विचार न करता नोटबंदी केली. त्यामुळे उद्योग, शेतकरी यासह सर्वांचेच कंबरडे मोडले आहे. लोकांचे प्रश्न जाणून घेऊन त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही कन्याकुमारी पासून काश्मीरपर्यंत ही भारत जोडो यात्रा काढली आहे. निवडणुकीत या यात्रेचे काय परिणाम होतील याचा आम्ही विचार करीत नाही. तो येणारा काळ ठरवेल. परंतु एवढे मात्र नक्की या यात्रेमुळे भाजप मात्र घाबरली आहे, त्यामुळेच दररोज टी शर्ट घातले, काय जेवण केले यावरून टीका करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमचे सोशल मिडिया अकाऊंट बंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कारण पहिल्यांदाच काँग्रेस एवढ्या आक्रमक पणे राजकीय एजंडा घेऊन रस्त्यावर उतरली आहे. 

राहुल यांच्या ६५ दिवसांत ५ प्रेसया देशात 12 वर्ष राज्याचा आणि आठ वर्षे देशाचा पंतप्रधान असलेल्या व्यक्तीने अद्याप एकही प्रेस घेतली नाही, तर राहुल गांधी यांच्या गेल्या 65 दिवसात 5 प्रेस झाल्या आहेत. पुढची पत्रकार परिषद 17 तारखेला शेगाव येथे होणार आहे. असेही रमेश म्हणाले.

कॉंग्रेसला मिळाली संजीवनी राज्यात होत असलेल्या निवडणुका किंवा 2024 ची लोकसभा समोर ठेऊन आम्ही ही भारत जोडो यात्रा काढली नाही. त्यामुळे ही चुनाव जितो यात्रा नाही. परंतु या यात्रेमुळे काँग्रेस ला मात्र संजीवनी मिळाली असून ती पुनरुज्जीवत झाली आहे.  

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNandedनांदेड