शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
2
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
3
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
4
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
5
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
6
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
8
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  
9
पहिल्या T20 आधी बांगलादेशच्या संघात घबराट? मशिदीत न जाता 'या' ठिकाणी केलं नमाज पठण
10
भाजपाची जम्मू काश्मिरात मोठी खेळी! 'या' पाच आमदारांमुळे सत्तेचं समीकरण बदलणार?
11
अजिंक्य रहाणेला तोड नाय! मुंबईच्या विजयाची 'गॅरंटी' देणारा दिग्गज कर्णधार, पाहा आकडेवारी
12
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
13
IndiGo Airlines: इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!
14
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
15
बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक हरपला; माजी आमदार सीताराम दळवींचं मुंबईत निधन
16
"रोहित शर्मा अन् टीम इंडियाला माझा सलाम..."; ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने केला कौतुकाचा वर्षाव
17
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
18
₹९९ च्या इश्यू प्राईजच्या IPO ला जबरदस्त प्रतिसाद, ३१ वर्ष जुनी आहे कंपनी; जाणून घ्या
19
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
20
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन

सुप्रिया सुळेंची छोटी कृती, मोठा संदेश; यात्रा मार्गातील कचरा उचलत जागरूकतेची झलक

By सुमेध उघडे | Published: November 10, 2022 6:47 PM

राहुल गांधींच्या साथीला राष्ट्रवादी; खा. सुप्रिया सुळे, आ. जयंत पाटील यात्रेत सहभागी

नांदेड : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा आज नांदेड शहरात दाखल झाली. यावेळी त्यांच्या साथीला राष्ट्रवादीचे दिग्गज नेते दिसून येत आहेत. राष्ट्रवादीच्या खा. सुप्रिया सुळे आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सहभागाने यात्रेत उत्साह संचारला होता. दरम्यान, खा. सुळे यांच्या एका छोट्या कृतीने पदयात्रेत मोठा संदेश गेला आहे. यात्रेच्या मार्गात प्लास्टिक बॅगचा कचरा दिसताच नकळत खा. सुळे यांनी उचलून घेतला. 

महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा राहुल गांधी नांदेडात घेणार असून, त्यांच्या सभेची उत्सुकता ताणली गेली आहे. आज दुपारी पदयात्रा नांदेड शहरात दाखल झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसचे नेते खा. सुप्रिया सुळे, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी यात्रेत सहभाग घेतला. त्यांच्या सहभागाने यात्रेस आणखी बळ मिळाल्याचे चित्र होते. खा. सुळे आणि जयंत पाटील यांनी यात्रेकरुंसोबत संवाद साधला. खा. सुळे मनमोकळ्या संवादासाठी प्रसिद्ध आहेत. यामुळे त्यांच्या आजूबाजूला कार्यकर्त्यांची गर्दी होती. यात्रा शिवाजी नगर येथे आली असता खा. सुळे यांना समोरील मार्गात प्लास्टिकचा बॅगचा कचरा दिसला. सर्वजण त्यावरून जात असताना खा. सुळे यांनी ती बॅग खाली वाकून उचलली. खूप गर्दी असतानाही रस्त्यात पडलेला कचरा दिसताच एक जबाबदार नागरिकाचे कर्तव्य पार पाडत त्यांनी सहज प्लास्टिक बॅग उचलली. त्यांच्या या छोट्या कृतीने सहभागी सर्वांना मोठा संदेश दिला आहे. साधेपणासोबत खा. सुळे यांच्या जागरूकतेची चर्चा यानिमित्ताने यात्रेकरूंमध्ये सुरु होती. 

राहुल गांधी काय बोलणार ?

कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेला प्रारंभ झाला. ६० दिवसांचा प्रवास करून या यात्रेने ७ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातून महाराष्ट्रात प्रवेश केला. दोन दिवसांपासून ही यात्रा जिल्ह्यात आहे. देगलूर या तालुक्यातील वेन्नाळी, आटकळी, बिलोली तालुक्यांतील खतगाव फाटा, भोपाळामार्गे ही यात्रा ९ नोव्हेंबर रोजी नायगाव तालुक्यातील शंकरनगर येथे पोहोचली आहे. आज शंकरनगर, नायगाव आणि कृष्णूरपर्यंतचा प्रवास करून ही यात्रा दुपारी नांदेड शहरातील देगलूर नाका येथे पोहोचली. संध्याकाळी शहरातील नवा मोंढा येथे राहुल गांधी राज्यातील पहिल्या जाहीर सभेस संबोधित करणार आहेत. 

राज्याच्या राजकारणावर काय बोलणार?महाराष्ट्रात शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत होते. शिवसेनेतील बंडाळीनंतर हे सरकार कोसळले आणि एकनाथ शिंदे गट- भाजपचे सरकार स्थापन झाले. यावर राहुल गांधी काय बोलतात? देशातील महागाई, बेरोजगारी, शिक्षणाच्या प्रश्नावरही त्यांची भूमिका गुरुवारी जाहीर सभेतून पुढे येणार आहे. त्यामुळे या जाहीर सभेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्राNandedनांदेडSupriya Suleसुप्रिया सुळेRahul Gandhiराहुल गांधी