शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

काँग्रेसचे नुकसान करण्यासाठीच ‘बीआरएस’ महाराष्ट्रात; संजय राऊत यांचा आरोप

By शिवराज बिचेवार | Published: May 20, 2023 4:55 PM

तेलंगणात काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ‘बीआरएस’कडून तेलंगणा हातचे जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

नांदेड : महाराष्ट्रात सध्या तेलंगणातील भारत राष्ट्र समितीच्यावतीने जोर लावण्यात येत आहे; परंतु या ठिकाणी राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसला नुकसान पोहोचविण्याचाच ‘बीआरएस’चा प्रयत्न आहे, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शुक्रवारी (दि. १९) सायंकाळी प्रगट मुलाखतीदरम्यान त्यांनी प्रादेशिक पक्षांच्या भूमिकांवर आपले मत व्यक्त केले. 

तेलंगणातील भारत राष्ट्र समितीने आपल्या पक्षाचा देशव्यापी विस्तार करण्याच्या उद्देशाने पहिले पाऊल महाराष्ट्रातील नांदेडातच टाकले आहे. गेल्या काही महिन्यांत तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा ‘बीआरएस’चे नेते के. चंद्रशेखर राव यांनी तिसऱ्यांदा नांदेडचा दौरा केला आहे. तसेच शुक्रवारी त्यांनी राज्यभरातील २८८ विधानसभा मतदारसंघांतील प्रमुखांचे शिबिरही नांदेडातच आयोजित करून राज्याची व्यूहरचना नांदेडातून करण्याचा संदेश दिला. त्यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली. ते म्हणाले, तेलंगणात काँग्रेसची स्थिती मजबूत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत ‘बीआरएस’कडून तेलंगणा हातचे जाईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्याचमुळे ‘बीआरएस’कडून महाराष्ट्रात काँग्रेसला नुकसान पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणत्याही पक्षाला राज्य आपल्या हातून जाऊ नये, असेच वाटते, असेही राऊत म्हणाले.

मेळाव्यात पदाधिकाऱ्यांमध्ये राडानांदेड उत्तर मतदारसंघात ठाकरे गटाचा मेळावा खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पार पडला. भाषणात खा. राऊत यांनी ही गुरुगोविंदसिंघजी यांची पवित्र भूमी असल्याचा उल्लेख केला. भाषण संपल्यानंतर व्यासपीठावरून खाली उतरत असताना वाहतूक आघाडीचे रामगडिया यांनी त्याबद्दल राऊत यांचे आभार मानले. त्याच वेळी जिल्हाप्रमुख माधव पावडे तिथे आले. यावेळी दोघांमध्ये राऊत यांच्यासमोरच शाब्दिक बाचाबाची आणि ढकला-ढकली झाली. या प्रकाराची उपस्थितांमध्ये चर्चा सुरू होती.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNandedनांदेडK Chandrashekar Raoके चंद्रशेखर राव