शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack : बांदीपोरामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ४ दहशतवाद्यांना अटक, पूंछ-अनंतनाग आणि उधमपूरमध्ये चकमक सुरू
2
४८ तासांत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश; सीमा हैदरचं आता काय होणार?
3
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
4
पहलगाम व्हॅलीचे नाव 'हिंदू व्हॅली' करा! मराठी अभिनेत्याचा सरकारला सल्ला, म्हणाला- "श्रीनगरला भारताची उपराजधानी घोषित करा"
5
Success Story: 'आपली आजी', वय वर्ष ७४, युट्यूबद्वारे महिन्याला ६ लाखांची कमाई; मराठमोळ्या आजींचा कसा आहे प्रवास?
6
FIITJEE चे मालक डीके गोयल यांच्याविरोधात ईडीची कारवाई, १० ठिकाणांवर छापेमारी
7
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
8
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
9
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
10
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
11
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
12
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
13
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
14
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
15
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
16
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
17
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
18
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
19
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
20
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा

काँग्रेसचा मतांचा टक्का यंदा पहिल्यांदाच घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:20 IST

गेल्या सहा लोकसभा निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच काँग्रेसची मतांची टक्केवारी घसरली आहे़ यंदा झालेल्या वाढीव मतदानाचा लाभ भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर यांना मिळाला असताना वंचितने मुसंडी मारल्यामुळे त्याचा फटका थेट काँग्रेसला बसला आहे़ नवमतदारही भाजपाकडेच वळल्याचे दिसून आले़

शिवराज बिचेवार।नांदेड : गेल्या सहा लोकसभा निवडणुकीत यंदा पहिल्यांदाच काँग्रेसची मतांची टक्केवारी घसरली आहे़ यंदा झालेल्या वाढीव मतदानाचा लाभ भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर यांना मिळाला असताना वंचितने मुसंडी मारल्यामुळे त्याचा फटका थेट काँग्रेसला बसला आहे़ नवमतदारही भाजपाकडेच वळल्याचे दिसून आले़दरवेळी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपाच्या उमेदवारामध्ये केवळ चार ते पाच टक्के मतांचा फरक राहत होता़ ही पाच टक्के मतेच दरवेळी निवडणुकीत काँग्रेसच्या पारड्यात विजय टाकत होता़ यापूर्वी मकबुल सलीम, डॉ़व्यंकटेश काब्दे, गुणवंत हंगरगेकर, सुरेश गायकवाड असे सक्षम उमेदवार रिंगणात असताना त्यांना मिळालेली टक्केवारी ही निर्णायक ठरली नव्हती़ परंतु यावेळी बहुजन वंचित आघाडीने १४़७२ टक्के एवढी मते घेतली़ त्याचा मोठा फटका काँग्रेसलाच बसला़ २००९ मध्ये काँग्रेसचे भास्करराव पाटील खतगावकर यांना ४७़८१ टक्के तर भाजपाचे डॉ़धनाजीराव देशमुख यांना ४१़११ टक्के मते मिळाली होती़ १९९९ मध्ये काँग्रेसचे खतगावकर यांना ४४़६९ तर भाजपाचे धनाजीराव देशमुख यांना ४०़२४ टक्के मते होती़ यावेळी दोघांमध्ये केवळ चार टक्के मतांचा फरक होता़ २००४ मध्ये मात्र अचानक भाजपाची टक्केवारी वाढली होती़ भाजपाचे डी़ बी़ पाटील यांना ४५़१५ तर भास्करराव खतगावकर यांना ४२़११ टक्के मते होती़ २००९ मध्ये मात्र काँग्रेस आणि भाजपात तब्बल १० टक्क्यांचा फरक होता़ भास्करराव खतगावकर यांना ४६़५२ तर संभाजी पवार यांना ३६़५० टक्के मते होती़ तर २०१४ मध्ये अशोकराव चव्हाण यांना ४८़६७ टक्के मते मिळविली होती़ त्या तुलनेत डी़बी़पाटील यांना ४०़६३ टक्के एवढी मते मिळाली होती़ या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच काँग्रेसची टक्केवारी ४० पेक्षा कमी भरली़ अशोकराव चव्हाण यांना ३९़५५ टक्के तर भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर यांना ४३़६१ टक्के मते मिळाली़ भाजपाच्या टक्केवारीत फारशी वाढ झाली नसली तरी, काँग्रेसच्या टक्केवारीवर मतांच्या धु्रवीकरणाचा मोठा परिणाम झाला़ वंचित आघाडीचे यशपाल भिंगे यांनी तब्बल १४़७२ टक्के मिळविली़ यापूर्वी काँग्रेस-भाजपा व्यतिरिक्त तिसरा तगडा उमेदवार रिंगणात असताना त्यांनाही एवढी मते मिळाली नव्हती़

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnanded-pcनांदेडElectionनिवडणूक