शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

वाळू घाटाच्या लिलावधारकांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 00:43 IST

शासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा जास्तीचा वाळू उपसा करून गोदावरी नदीच्या काठावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात साठा केला. शासनाच्या वाळूची चोरी व पर्यावरणाच्या नियमांचा भंग केल्याच्या आरोपावरून महाटी येंडाळा व कौडगाव तीनही वाळू घाटांच्या लिलावधारकांवर उमरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देउमरी, नायगाव वाळूघाट ईटीएस मोजणीच्या अहवालामुळे पितळ पडले उघडे

उमरी/नायगाव : शासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा जास्तीचा वाळू उपसा करून गोदावरी नदीच्या काठावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात साठा केला. शासनाच्या वाळूची चोरी व पर्यावरणाच्या नियमांचा भंग केल्याच्या आरोपावरून महाटी येंडाळा व कौडगाव तीनही वाळू घाटांच्या लिलावधारकांवर उमरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मेळगाव ता. नायगाव येथील लिलावधारकावरही गुन्हे नोंदविण्यात आले.कौडगाव येथील लिलाव धारक लोकडेश्वर बिल्डिंग मटेरियल सप्लायर्सचे दत्तात्रय बापूराव जाधव (रा.नायगाव ता. नायगाव जि. नांदेड), येंडाळा वाळूघाट लिलावधारक ओमकार कन्स्ट्रक्शनचे दादाराव ढगे (रा. पिंपळकौठा ता. मुदखेड जि. नांदेड) व महाटी वाळू घाटाचे लिलावधारक विष्णू शंकर नारणवार (रा. उमरी दहिगाव ता. माळशिरस जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या तीन लिलावधारकांची नावे आहेत. याप्रकरणी मंडळ अधिकारी अर्जुन पवार यांनी पोलिसात तक्रार दिली.वाळू उत्खननाची परवानगी मिळाल्यावर लिलाव धारकांनी गोदावरी नदीपात्रातून वाळूचे उत्खनन करण्यास सुरुवात केली. मात्र परवानगीपेक्षा मोठ्या प्रमाणात अधिकचा वाळू उपसा करण्यात आला. या बाबींची शहानिशा करण्यासाठी शासनाने या तीनही वाळू घाटांच्या परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी साठा केलेल्या वाळूची तपासणी केली व पंचनामा केला. या सर्व वाळूसाठ्याची ६ जून रोजी ईटीएस प्रणालीद्वारे मोजणी करण्यात आली. या ईटीएस मोजणीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून त्याद्वारे वाळू उत्खननाचे पितळ उघडे पडले. कौडगाव वाळू घाटाचा लिलाव २३ एप्रिल रोजी झाला. या वाळू घाटावरून ३०९२ ब्रास वाळूचा उपसा करण्याची परवानगी शासनाने दिली होती.मेळगाव ता. नायगाव येथील लिलावधारक ज्ञानेश्वर दिगंरब कळसे यांच्याविरुद्ध कुंटूर पोलिसात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.दरम्यान, उमरी व नायगाव तालुक्यात सर्व रेतीसाठ्याची मोजणी महसूल विभागाने केली आहे. ज्या खाजगी जमिनीच्या गटातून रेतीसाठा जप्त करण्यात आला आहे. अशा सर्व खाजगी जमीनधारकाविरुद्धही दंडात्मक कारवाई तसेच गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे. दंडाची रक्कम वसूल न झाल्यास त्यांच्या जमिनीवर बोजा टाकण्याची कारवाई उमरी व नायगाव तहसीलदारामार्फत करण्यात येत आहे. खाजगी जमीनधारकांनी रितसर परवानगी घेवून साठे केले आहेत का? त्यांच्याकडे बारकोडयुक्त पावती व रेतीघाट धारकाकडून रेती खरेदी केल्याच्या कायदेशीर पावत्या आहेत का? याची तपासणी केली जाणार जाणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.परवानगीपेक्षा जास्त वाळूचा उपसा,पर्यावरणाचे भारी नुकसान

  • संबंधित लिलाव धारकाने शासनाने परवानगी दिलेल्या प्रमाणापेक्षा १२ हजार ६१६ .४० ब्रास जास्तीचा वाळू उपसा केला. ज्याची किंमत ५ कोटी २६ लाख ७३ हजार ४७० रुपये एवढी होते.
  • महाटी येथील वाळू घाटाचा लिलाव २३ एप्रिल रोजी झाला. या वाळू घाटाच्या लिलाव धारकास शासनाने २८७१ ब्रास वाळूचा उपसा करण्याची परवानगी दिली होती. मात्र या लिलाव धारकाने शासनाने परवानगी दिलेल्या प्रमाणापेक्षा ६३६६.४० ब्रास जास्तीच्या वाळूचे उत्खनन केले. ज्याची किंमत २ कोटी ६५ लाख ७९ हजार ७२० रुपये एवढी होते. येंडाळा वाळू घाटाचा लिलाव २२ मे रोजी झाला.
  • सदर लिलाव धारकाला गोदावरी नदीपात्रातून २८६२ ब्रास वाळू उत्खनन करण्याची परवानगी दिली,मात्र संबंधिताने या प्रमाणापेक्षा ११ हजार ९५०.७४ ब्रास एवढ्या जास्तीचे वाळू उत्खनन केले. या वाळूची किंमत ४ कोटी ९८ लाख ९४ हजार ३३९ रुपये एवढी होते. अशाप्रकारे वरील तीनही वाळू घाटांच्या लिलाव धारकांनी एकूण ३० हजार ९३३ .५४ ब्रास एवढ्या वाळूची चोरी केल्याचे निष्पन्न झाले. वाळूची चोरी, नियमाचा भंग तसेच पर्यावरणाचे नुकसान केल्याचा आरोप या वाळूघाट धारकांवर करण्यात आला
  • मंडळ अधिकारी अर्जुन पवार यांनी उमरी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून तिनही वाळूघाट लिलाव धारकांवर गुन्हे नोंदविण्यात आले. पोलीस निरीक्षक उत्तम मुंडे व सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन इंद्राळे तपास करीत आहेत.
टॅग्स :NandedनांदेडsandवाळूNanded policeनांदेड पोलीसCrime Newsगुन्हेगारी