शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पाणीटंचाईमुळे पशूपालकांची चाऱ्यासाठी वणवण; कडब्याच्या पेंडीला २० रुपयांचा भाव

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: March 26, 2024 19:31 IST

हिरवा चारा घेण्याचा खर्च परवडत नसल्याने जनावरे विक्रीसाठी बाजाराकडे नेत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे.

नांदेड :  जिल्ह्यातील अनेक भागात पाण्याच्या टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत असताना दुसरीकडे  जनावरांसाठी लागणारा सुका चाराही महागला आहे. दहा रुपयाला मिळणाऱ्या कडब्याच्या पेंडीचा भाव २० रुपयावर गेल्याने पशुपालक अडचणीत आले आहेत.

जिल्ह्यात यंदा ज्वारीची लागवड बऱ्यापैकी असली तरी कडब्याचा सुका चारा मात्र कमी होणार आहे. हिरवा चारा घेण्याचा खर्च परवडत नसल्याने जनावरे विक्रीसाठी बाजाराकडे नेत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. दुभत्या जनावरांना सांभाळणे पशुपालकांसाठी अत्यंत कठीण होत आहे. उत्पादन खर्च आणि होणारे उत्पादन याचा मेळ बसत नसल्याकारणाने पशुपालक आता जनावरे बाजाराकडे घेऊन जात आहेत. भाकड जनावरे सांभाळणे तर दुभत्या जनावरांपेक्षाही अवघड आहे. होणारा खर्चाचा विचार करता ही जनावरे बाजारात नेऊन विकलेली बरी असा विचार आता पशुपालक करत आहे. 

जिल्ह्यातील हल्ली बैल बाजारात मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीसाठी आणली जात आहेत. हिरवा चारा उपलब्ध नसल्यामुळे दुग्ध व्यावसायिकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. चारा महागल्यामुळे दुभती जनावरे सांभाळणे कठीण झाले आहे.  भाकड जनावरांची तर थेट विक्री करण्यात येत असल्याचे सध्या  बैल बाजारात हे चित्र पाहावयास मिळत आहे. कडबा बाजारात अनेक ठिकाणी शेतकरी आणि पशुपालक फिरून कुठे स्वस्त चारा मिळतो का, याची देखील पाहणी करत आहेत.

अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यातच चारा पिकांची लागवड खूप कमी प्रमाणात झाली असल्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर होत आहे. हिरवा चारा बाजारात आहे, मात्र त्याची किंमत गगनास भिडलेली आहे. हिरव्या चाऱ्याची एक पेंडी २५ ते ३० रुपये झाली आहे. दूध देणाऱ्या जनावरांसाठी  दिवसाला आठ ते दहा पेंड्याचा बंदोबस्त करून ठेवावा लागतो. त्यामुळे दरदिवशी अडीचशे ते तीनशे रुपये या जनावरांसाठी खर्च करावा लागतो. या जनावरांकडून मिळणारे दूध आणि होणारा खर्च याचा मेळदेखील बसत नाही. यामुळे दुधाचा व्यवसाय करणारे पशुपालक अत्यंत अडचणीत आहेत. उन्हाची तीव्रता वाढल्यास हिरव्या चाऱ्याचा प्रश्न बिकट होणार आहे. 

वैरणीसाठी मोजावे लागतात अधिकचे पैसेसध्या उस तोडणी बाकी असल्याने अणखी आठ ते दहा दिवस शेतकऱ्यांना चारा मिळेल. तसेच ज्या भागात पाण्याची व्यवस्था आहे, तेथील स्थिती बरी आहे. पण कोरडवाहू तालुक्यात ज्या शेतकऱ्यांकडे अधिक जनावरे आहेत, त्यांच्याकडे जर चाऱ्याची सोय नसेल, तर अशा शेतकऱ्यांसमोर आता वैरण गोळा करण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागण्याची वेळ येणार आहे. 

जनावरांची उपासमारसध्या उसाची तोडणी सुरू असल्याने हिरवा चारा आहे. पण काही दिवसांत तुटवडा जाणवेल. त्यासाठी सुका चारा घेणे आवश्यक आहे. मात्र, कडब्याचे भाव २० रुपये पेंडीवर पोहोचल्याने कडबा घेणे अतिशय खर्चिक आहे.-विश्वनाथ वाघ, शेतकरी पशुपालक पाथरड (रेल्वे)

टॅग्स :NandedनांदेडFarmerशेतकरी