शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

तीन महिन्यात राज्यभरात ५० लाख युनिटची वीजचोरी, महावितरणने अशी आणली उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2022 7:22 PM

राज्यात सर्वाधिक वीज गळती असलेले २३० फिडर निश्चित करून महावितरणने ही गळती उघडकीस आणली आहे.

नांदेड :महावितरणच्या अधिकाऱ्यांनी राबविलेल्या विशेष मोहिमेत मागील तीन महिन्यांत राज्यातील ५० लाख युनिटची वीज चोरी उघडकीस आणण्यास यश आले आहे. महावितरणच्या वतीने ही माहिती देण्यात आली.

महावितरणच्या प्रत्येक फिडरवरून गेलेली वीज आणि संबंधित ग्राहकाच्या मीटरवर नोंद झालेला वीज वापर याची पडताळणी करून वीज गळती निश्चित केली जाते. महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक झोनमधील सर्वाधिक वीज गळती असलेले फिडर्स निश्चित केले होते. त्यानंतर त्यांच्याशी जोडलेल्या घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांच्या वीज वापरावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले. संबंधित ग्राहकाच्या मीटरमध्ये अचूक रीडिंग येते का? मीटरमध्ये फेरफार केला आहे का, आकडा टाकून वीज चोरी होत आहे का, याची माहिती काढून अधिकाऱ्यांनी कारवाई केली. 

मागील तीन महिन्यांपासून राज्यभरात ही मोहीम सुरू होती. परिणामी वीज चोरीला आळा बसला असून, ५० लाख युनिटची वीज चोरी राज्यात उघडकीस आणली आहे. राज्यात सर्वाधिक वीज गळती असलेले २३० फिडर निश्चित करून महावितरणने ही गळती उघडकीस आणली आहे. ५० ते ७० टक्क्यांपर्यंत असलेली गळती २० टक्क्यांवर आणणे, ३० ते ५० टक्के असलेली गळती १५ टक्क्यांवर आणण्याचे उद्दिष्ट ठेवून हे काम करण्यात आले. तीन महिन्यांत मिळालेल्या यशामुळे यापुढेही मोहीम सुरू ठेवली जाणार असल्याचे महावितरणतर्फे सांगण्यात आले.

टॅग्स :Nandedनांदेडmahavitaranमहावितरण