शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

अर्धापूरात मुसळधार पावसाने हाहाकार; पिकांसोबत शेतकऱ्यांचे पशुधन गेले वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 17:14 IST

Rain in Nanded : शेलगाव, मेंढला, सांगवी गावांचा संपर्क तुटला

ठळक मुद्देपुर परिस्थितीत झपाट्याने वाढचोवीस तासांत १२८ मि.मी. पाऊस

- गोविंद टेकाळे

अर्धापूर ( नांदेड ) : - जिल्ह्यात सर्वाधिक १२८.५ मि मी. पाऊस अर्धापूर तालुक्यात  सोमवारी रात्री झाला. जोरदार पावसामुळे नदी, नाल्यांना मोठा पूर आले. शेलगाव खु व बु , मेंढला, सांगवी गावांचा संपर्क तुटला आहे.अस्मानी संकटाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. दाभड, मालेगाव व अर्धापूर मंडळात पावसाने दाणादाण उडवली आहे. तालुक्यांत ढगफुटीसदृश पाऊस पडल्याने शेकडो एकर जमीन पावसाच्या पाण्याखाली गेली आहे. 

अर्धापूर तालुक्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे असना नदी (मेंढला नाला) पूर आला. पुराचे पाणी शेलगाव या गावात शिरल्याने गावामध्ये चार ते पाच फुटांपर्यंत पाणी वाहत आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस अर्धापूर महसूल मंडळांमध्ये चोवीस तासांत १२८ मि.मी.रेकॉर्डब्रेक पावसाची नोंद झाली.अर्धापूर तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नादी नाल्यात पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत असून असना नदीला पूर आल्याने. नदी काठावर असलेली शेलगाव खु व बु.,मालेगाव, कोंढा, सावरगाव, गणपुर, उमरी, देऊळ ,सांगवी / खडकी ,मेंढला, बामणी, निजामपुर वाडी, पिंपळगाव महादेव, कामठा आदी गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

काढणीस आलेले सोयाबीन पीक पाण्याखाली गेले असून नदीकाठावरील शेतात पुराचे चार ते पाच फुटांपर्यंत पाणी असुन. कापूस, तूर, सोयाबीन, मूग,ज्वारी,केळी आदी पिकांसह हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली गेल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.नदीकाठच्या शेतातील पिके खरडली तर शेतातील ठिबक पाइप व पाळीव प्राणी वाहून गेल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी घटनास्थळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर तालुका अध्यक्ष बालाजीराव गव्हाणे आदींनी पाहणी करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

जिल्ह्यातील सर्वाधिक पाऊस अर्धापूर तालुक्यात झाला असल्याने ग्रामीण भागात व शेत शिवारात परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तहसीलदार सुजित नरहरे, नायब तहसीलदार मारोतराव जगताप,पोलिस निरीक्षक अशोक जाधव,गट विकास अधिकारी मीना रावताळे, एस पी गोखले,विस्तार अधिकारी मुंडकर, मंडळ अधिकारी शफीयोद्दीन, प्रफुल्ल खंडागळे, संजय खिलारे तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक कृषी अधिकारी आदी अधिकारी यांच्यासह शासकीय यंत्रणा पूर परिस्थितीची पाहणी करत आहे.

हेही वाचा - Video : थरारक ! नदीच्या पुरात जीप वाहून गेली; एका प्रवाशाने झाडावर चढून वाचवला जीव

शेतकऱ्यांचे पशुधन गेले वाहुनशेतकऱ्यांनी परस भर पुराच्या पाण्यात जाऊन आपल्या जनावरांचे प्राण वाचवले आहेत तर शेलगाव येथील रामराव शंकराव राजेगोरे यांचे एक लाखाचे पशुधन पुराच्या पाण्यात वाहून गेले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. 

४८ तासात तक्रार दाखल करावीअर्धापूर तालुक्यातील नदीकाठच्या आदी शेतीचे नुकसानीचे फोटो काढून ४८ तासात विमा कंपनीस लेखी तक्रार  ऑनलाईन पद्धतीने करावी व ऑनलाईन नोंद न झाल्यास  तालुका कृषी कार्यालयात तक्रारी ची प्रत देण्यात यावी -अनिल शिरफुले, तालुका कृषी अधिकारी ,अर्धापूर

बॅकवॉटर मुळे पुरपरिस्थितीत वाढगोदावरी नदी असना नदीचे पाणी घेत नसल्याने ( बॅक वॉटर ) मुळे पूर्व परिस्थितीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. शासन स्तरावर याची दखल घ्यावी व कुठलीही जिवितहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी. - बालाजी गव्हाणे, तालुकाध्यक्ष, कॉंग्रेस कमिटी अर्धापूर

हेही वाचा - video : पुराच्या पाण्यात स्टंटबाजीची हौस; कुपटा येथील दोघे थोडक्यात बचावले

टॅग्स :RainपाऊसNandedनांदेड