शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ऐन दिवाळीत बळीराजा आर्थिक संकटात; हमीभावापेक्षा कमी दराने शेतमालाची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 16:16 IST

बाहेर निवडणुकीची चर्चा पण शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलणार कोण ?

नांदेड : दरवर्षी शेतकऱ्यांचा शेती माल हमीभावाने खरेदी करण्याची घोषणा केली जाते. हमीभाव ठरवलाही जातो. मात्र, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी कुठेच होताना दिसत नाही. सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा ७९२ ते १३९२ रुपये प्रति क्विंटल कमी दराने सोयाबीन विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ऐन सणासुदीच्या काळात शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने सरकारला शेतकऱ्याच्या गळ्यातील फास हटवायचा नाही का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

आगामी विधानसभा निवडणूक व दिवाळी सणाच्या अनुषंगाने ‘लोकमत’ने गुरुवारी शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. यावेळी शेतीमालाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. मागच्या काही वर्षांपासून शेतकरी हा अस्मानी आणि सुलतानी संकटांच्या कचाट्यात अडकला आहे. कधी अतिवृष्टी तर कधी कोरड्या दुष्काळाचा सामना करत शेतकरी शेती माल पिकविण्यासाठी धडपडतोय. सरकारकडून अनेक योजनांच्या घोषणांचा गरज नसताना पाऊस पाडला जात आहे. मात्र, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या मालाला पाहिजे तसा भाव देण्यासाठी कुणीच प्रयत्न करताना दिसून येत नाही. हमीभावाने शेतीमाल खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रही उभारण्यात आले. मात्र एकाही हमी भाव खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना आपला माल विक्री करता आला नाही. सध्या खर्च अधिक आणि उत्पादन कमी झाल्याने शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्याकडे आत्महत्येशिवाय पर्याय उरला नाही. अशी खंतही शेतकऱ्यांनी बोलून दाखविली.

हमीभाव केवळ नावालाचकेंद्र सरकारने सोयाबीनला यावर्षीच्या चालू खरीप हंगामासाठी ४८९२ रुपये प्रति क्विंटल हमीभाव निश्चित केला आहे. सोयाबीनचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना सरकारने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा ७०० ते ८०० रुपये प्रति क्विंटल कमी दराने शेतकऱ्यांना सोयाबीन विकावे लागत आहे. नांदेडच्याबाजार समितीत गुरुवारी ३९०० रुपये सरासरी दराने सोयाबीनची विक्री झाली. त्यामुळे हमी भाव केवळ नावालाच दिसून येत आहे.व्यंकटेश कदम, शेतकरी

एकही रूपया शिल्लक राहत नाहीशेतकऱ्याला ऐकरी सोयाबीनचा खर्च सरासरी अठरा ते वीस हजार रूपये ऐवढा येतो. अन् उत्पनही वीस हजार रूपयांच्या आसपास होत आहे. यामध्ये शेतकऱ्याने केलेल्या स्वता मेहनतीचा मोबदला पकडला तर खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती होते. त्यामुळे शेतकऱ्याला शेतीतील उत्पन्नातून एक रूपयाही शिल्लक राहत नसल्याने चांगला भाव मिळणे आवश्यक आहे.- विठ्ठल खांडरे, शेतकरी

शेती मालाला भाव नसल्याने शेतकरी हताशमागच्या काही वर्षापासून शेतकऱ्याच्या कोणत्याचा मालाल चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग हताश झाला आहे. मेहनतीच्या तुलने मोबदला मिळत नसल्याने निराश होवून कित्येक शेतकऱ्यांनी गळफास लावून मृत्यूला कवटाळले. त्यामुळे सरकारने वायफळ घोषणा राबविण्यापेक्षा शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावा. तरच शेतकरी आत्महत्या थांबतील.- आनंदराव शिंदे, शेतकरी

सोयाबीनचा सरासरी एकरी खर्चनांगरणी- १०००वखरणी-८००सोयाबीन बॅग- ३२००खत-१५००पेरणी- १०००तणनाशक- १५००औषध फवारणी- ४०००सोयाबीन काढणी- ३५००मळणी यंत्र- १५००माल वाहतूक- ५००एकुण खर्च- १८५००उत्पन्न- एकरी ५ क्विंटल, भाव- ३९००, एकुण उत्पन्न- १९५००

टॅग्स :NandedनांदेडAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMarketबाजार