शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

महावितरणमधील बदल्यांची चौकशी सुरू, मुख्य अभियंत्यासह संचालकांकडे पोहचल्या तक्रारी

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: August 31, 2024 19:15 IST

दरवर्षी सर्वसामान्य बदल्यांचे आदेश मे किंवा जून अखेर काढले जातात. पण, यावर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बदल्यांचे आदेश अधीक्षक अभियंता यांनी काढले आहेत.

नांदेड : नुकत्यात महावितरणच्यानांदेड सर्कलमध्ये करण्यात आलेल्या सर्वसाधारण बदल्या नियमबाह्य आणि चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याच्या तक्रारी मुख्य अभियंत्यासह छत्रपती संभाजीनगर येथील महावितरणच्या संचालकांकडे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत संभाजीनगर येथील महावितरणचे तीन सदस्यीय पथक २९ व ३० ऑगस्ट रोजी चौकशीसाठी नांदेडात दाखल झाले होते. या पथकांकडून बदल्यांमध्ये काही आर्थिक गैरव्यवहार झाले काय? याबाबत चाचपणी करण्यात येत आहे.

दरवर्षी सर्वसामान्य बदल्यांचे आदेश मे किंवा जून अखेर काढले जातात. पण, यावर्षी ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात बदल्यांचे आदेश अधीक्षक अभियंता यांनी काढले आहेत. महावितरणमधील वर्ग १, वर्ग २ च्या बदल्यांचे आदेश संचालक, मुख्य अभियंत्यांच्या स्वाक्षरीने काढले जातात, तर वर्ग ३ च्या बदल्या अधीक्षक अभियंता यांच्या स्वाक्षरीने, तर वर्ग ४ च्या बदल्या कार्यकारी अभियंत्याच्या स्तरावर केल्या जातात. कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शिक्षणासाठी अडथळे येऊ नयेत, त्यांना शैक्षणिक सत्राच्या प्रारंभी प्रवेश मिळावा, यासाठी मे-जूनमध्येच सर्वसाधारण बदल्यांचे आदेश काढले जातात. परंतु, यावर्षी शैक्षणिक सत्र सुरू होऊन दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर बदल्यांचे आदेश पारित केले आहेत. त्याचा परिणाम अनेक कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली असून, पाल्यांना अर्धे शैक्षणिक सत्र सोडून इतरत्र प्रवेश घेण्यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. या बदल्या करीत असताना विनंती, ज्येष्ठता व प्राधान्यक्रम याबाबत कुठलेही तारतम्य न ठेवता स्वत:च्या मर्जीनुसार बदल्या केल्याचा आरोप महावितरणच्या काही कर्मचारी संघटनेनेही वरिष्ठांना केलेल्या तक्रारीत केला आहे.

नांदेड सर्कलमध्ये ७० कर्मचाऱ्यांच्या बदल्यानांदेड सर्कलमधील ऑपरेटर, उच्चस्तर लिपिक, कारकून, टेक्निशियन अशा जवळपास ७० कर्मचाऱ्यांच्या बदल्या अधीक्षक अभियंता यांनी केल्या आहेत. या बदल्या करीत असताना कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार सोयीच्या ठिकाणी बदली देण्यास प्राधान्य देणे गरेजेचे आहे. असे असताना अधीक्षक अभियंत्याकडून यासंदर्भातील नियमांचे पालन न करता आपल्या मर्जीने बदलीचे आदेश काढल्याचा आरोपही केला आहे. अशा तक्रारी नांदेड सर्कलमधून अनेक संघटनांनी मुख्य अभियंता, तसेच संचालक महावितरण यांच्याकडे केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेऊन चौकशीसाठी महावितरणच्या संभाजीनगर येथील कार्यालयातील पथकाने नांदेडात दोन दिवस मुक्काम ठोकला. आता त्यांच्या चौकशीतून कोणाचे बिंग फुटणार ? याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :NandedनांदेडTransferबदलीmahavitaranमहावितरण