शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

संत विचारांचा अंगीकार करून समाजात प्रेम, शांतता आणि बंधुता वाढवू या: अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 19:13 IST

सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभाव हे संतांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात: अजित पवार

- मारोती चिलपिपरेकंधार (नांदेड) : मराठवाड्याची भूमी संघर्ष आणि शौर्याची भूमी आहे, आणि याच भूमीवर संतांची शिकवणही आहे. संघर्ष करून प्राप्त केलेली यशस्वी परंपरा आजही आपल्याला मार्गदर्शन करत आहे. संत विचारांचा अंगीकार करून समाजात प्रेम, शांतता आणि बंधुता वाढवू या, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी श्रीक्षेत्र उमरज येथे १०८ कुंडी विष्णूयाग महायज्ञ व श्री देवकीनंदनजी ठाकूर महाराज यांच्या वाणीतून श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम सप्ताहाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

अजित पवार पुढे म्हणाले, "मराठवाड्याला सहजासहजी काही मिळाले नाही, ते संघर्ष करून मिळवले आहे. त्याच इतिहासाला आजही आपण सन्मान देत आहोत. संत परंपरेचा विचार करत असताना, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, आणि संत एकनाथ यांच्या शिकवणीचे महत्त्व स्पष्ट होते. त्यांनी प्रेम, समता, बंधुत्व यावर आधारित जीवनशैली दिली." तसेच, महाराष्ट्रातील सर्वधर्मसमभावाच्या शिकवणीवर बोलताना ते म्हणाले की, "इथे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बौद्ध, जैन सर्वधर्म एकत्र राहतात. माणुसकी हाच धर्म आहे. जातीधर्माच्या सीमापार करत संतांनी मानवतेचा संदेश दिला. सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभाव हे संतांचे विचार आजही आपल्याला मार्गदर्शन करतात," असे ते म्हणाले. 

श्रीक्षेत्र उमरज येथील धाकटे पंढरपूर श्री संत नामदेव महाराज संस्थानाच्या पवित्र भूमीवर आयोजित या कार्यक्रमामध्ये राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, शिक्षक आमदार विक्रम काळे, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत संस्थानाचे महंत श्री एकनाथ महाराज यांनी संस्थानाच्या समाज उपयोगी कार्याची माहिती दिली. तसेच संस्थानला जोडणाऱ्या काही रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मागणी करण्यात आली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNandedनांदेड