शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

अर्धाअधिक कापूस अद्यापही घरातच, भाववाढीची प्रतीक्षा

By राजेश निस्ताने | Updated: January 23, 2025 06:51 IST

Nanded News: बाजारात कापसाचे दर वाढतील या आशेवर अर्धाअधिक कापूस शेतकऱ्यांच्या शेतात-घरातच पडून आहे. सध्या आहे त्यापेक्षा कापसाचे आणखी कमी भाव होणार नाहीत, असा ‘सीसीआय’ला (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) अंदाज आहे.

- राजेश निस्ताने   नांदेड - बाजारात कापसाचे दर वाढतील या आशेवर अर्धाअधिक कापूस शेतकऱ्यांच्या शेतात-घरातच पडून आहे. सध्या आहे त्यापेक्षा कापसाचे आणखी कमी भाव होणार नाहीत, असा ‘सीसीआय’ला (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) अंदाज आहे. भाव वाढल्यास मात्र शासकीय कापूस खरेदीतून सीसीआय ‘आऊट’ होणार आहे.

या वर्षी ‘सीसीआय’कडून राज्यात १२७ केंद्रे सुरू करण्यात आली. अलीकडे १ कोटी २५ लाख क्विंटल कापसाची (२० लाख २० हजार गाठी) खरेदी ‘सीसीआय’ने केली आहे. त्यात मराठवाडा व खान्देशात ८ लाख ८० हजार गाठी, तर विदर्भात १२ लाख २५ हजार गाठी बनतील, एवढा कापूस आतापर्यंत खरेदी करण्यात आला आहे.  

२९९ लाख गाठी उत्पादन? देशात १ कोटी १६ लाख हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड करण्यात आली. त्यातून २९९ लाख गाठी बनतील, एवढ्या कापूस उत्पादनाचा अंदाज ‘सीसीआय’ने वर्तविला आहे.आतापर्यंत देशात ७५ लाख गाठींचा कापूस खरेदी करण्यात आला. त्यात महाराष्ट्राचा वाटा २० लाख गाठींचा आहे. सध्या बाजारात कापूस गाठींना ५३ ते ५४ हजार एवढा भाव आहेआतापर्यंत राज्यात ४३ लाख गाठींच्या कापसाची खरेदी झाली आहे. गेल्यावर्षी हाच आकडा ३६ लाख गाठी एवढा होता.  

पथकाच्या आकस्मिक भेटी‘सीसीआय’च्या मुंबईतील पथकाकडून खरेदी केंद्रांवर आकस्मिक भेटी दिल्या जात आहेत. सोमवारी बीड, मंगळवारी परभणी व हिंगोलीत भेटी दिल्या गेल्या. बुधवारी अकोल्यात पथक पोहोचले. 

महाराष्ट्रात ‘सीसीआय’च्या सर्व १२७ केंद्रांवर कापूस खरेदी सुरू आहे. कुठेही तक्रारी नाहीत. तरीही आकस्मिक भेटी देऊन तपासणी केली जात आहे. शेतकऱ्याच्या कापूस खरेदीसाठी सीसीआय बांधील आहे. - एस.के. पाणीग्रही, मुख्य महाव्यवस्थापक, सीसीआय, मुंबई.   

टॅग्स :cottonकापूसNandedनांदेड