शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
2
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
3
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
4
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
5
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
6
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
7
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
8
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
9
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
10
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
11
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
12
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
14
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
15
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
16
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
17
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
18
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
20
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले

नांदेडात शेतकरी संघटनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 12:13 AM

शेतकºयांना खºया अर्थाने कर्जमुक्त करावे यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शेतकºयांना खºया अर्थाने कर्जमुक्त करावे यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़ या मोर्चात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते़सरकारने शेतमालावरील सर्व बंधने हटवून सरकारी हस्तक्षेप थांबवावा़ शेतीमालाचे भाव नियंत्रित करण्यासाठी निर्यात शुल्क वाढविणे, निर्यातीवर बंदी, चढ्या दराने परदेशातून आयात करणे, साठ्यांवर मर्यादा आदी उपाय बंद करावेत़ शेतकºयांना खुल्या अर्थव्यवस्थेचा लाभ घेऊ द्यावा़ आधारभूत किंमत ठरविणे आणि त्या किमतीमध्ये सर्व शेतीमाल खरेदीसाठी आवश्यक यंत्रणा उभी करणे हे अव्यवहार्य आहे़ वायदे बाजार हे बाजार किमतीच्या संशोधनाचे उत्तम साधन आहे़ जमीन धारण करणे, हस्तांतर करणे, कसावयास देणे, जमिनीचा उपयोग, सक्तीचे अधिग्रहण आदींच्या संदर्भाने अनेक अडचणींचे कायदे आहेत़ भूमिहीन होण्यास मज्जाव करणारे कायदे रद्द होण्याची गरज आहे़ संशोधन व गुंतवणूक यासाठी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय मार्ग पूर्णपणे खुले व्हावेत, ग्रामीणसाठी रस्ते, शेतरस्ते, वीज, पाणी, साठवणूक व प्रक्रिया वाहतूक विपणन माहिती तंत्रज्ञान व प्रयोगशाळा आदी संरचनासाठी गुंतवणूकीची गरज आहे़ शेतीची साधने करमुक्त करावी आदी मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने मोर्चा काढला़माजी प्रदेश अध्यक्ष गुणवंत पाटील हंगरगेकर, शिवाजीराव शिंदे उंचेगांवकर, अ‍ॅड़ धोंडिबा पवार, जमनाबाई ढगे, विठ्ठल जाधव, रामराव कोंडेकर, व्यंकटराव वडजे, शिवराज थडीसावळीकर, भीमराव शिंदे, किशनराव इळेगावकर, गणेश कदम, विठ्ठल रेड्डी, गोविंदराव लोंढे, शिवाजी जाधव आदींची उपस्थिती होती़