शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

नांदेडकरांची तहान भागणार; दिग्रस बंधाऱ्यातून पोलीस बंदोबस्तात सोडले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 16:45 IST

जवळपास 7 लाख लोकसंख्या असलेल्या शहराला विष्णुपुरीतून पाणी कमी पडू लागल्यानंतर पालम तालुक्यात दिग्रस बंधाऱ्याची उभारणी 2007-08 मध्ये करण्यात आली.

ठळक मुद्देदिग्रस बंधाऱ्यातून सोडलेल्या 25 दलघमी पाण्यापैकी 20 दलघमी पाणी उपलब्ध होईल

नांदेड़ - नांदेड शहरवासीयांची तहान भागवण्यासाठी परभणी जिल्ह्यातील दिग्रस बंधाऱ्यातून सोमवारी पहाटे 25 दलघमी पाणी सोडण्यात आले. पाणी सोडण्यासाठी होणारा विरोध लक्षात घेता मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.      नांदेड शहराची तहान भागवण्यासाठी विष्णुपुरीतून पाणीपुरवठा केला जातो. जवळपास 7 लाख लोकसंख्या असलेल्या शहराला विष्णुपुरीतून पाणी कमी पडू लागल्यानंतर पालम तालुक्यात दिग्रस बंधाऱ्याची उभारणी 2007-08 मध्ये करण्यात आली. बंधाऱ्याची उभारणी करतानाच नांदेडसाठी या बंधाऱ्यात पाणी राखीव राहील अशी तरतूद करण्यात आली होती. पुढे पाणी मिळत गेले. मात्र गेल्या काही वर्षांपासून नांदेडला पाणी देण्यास स्थानिकांनी विरोध करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात पाणी घ्यावे लागत आहे. २२ जानेवारी २०२० रोजी झालेल्या कालवा समितीच्या बैठकीत जलनियोजन मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी परभणी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. परभणीचे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी आवश्यक बंदोबस्त उपलब्ध करून दिला. त्यामुळे सोमवारी पहाटे 5 वाजता बंधाऱ्याचे दरवाजे उघडण्यात आले. सकाळी 9.35 वाजता दरवाजे बंद करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता निळकंठ गव्हाणे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील, करडीले, तहसीलदार ज्योती चव्हाण, पोलीस निरीक्षक सुनील माने यांची उपस्थिती होती.      दिग्रस बंधाऱ्यातून सोडलेल्या 25 दलघमी पाण्यापैकी 20 दलघमी पाणी उपलब्ध होईल अशी माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे यांनी दिली. जुलै अखेरपर्यंचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हे पाणी उपलब्ध झाल्याने मार्गी लागल्याचेही अंधारे म्हणाले.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका