शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

मराठवाड्यात नाही 'एसडीआरएफ'चे पूर्णवेळ पथक; 'गोल्डन अवर'मध्ये मदतीसाठी लागतो वेळ

By प्रसाद आर्वीकर | Published: June 14, 2024 1:10 PM

केवळ पावसाळ्यात नियुक्ती; 'गोल्डन अवर'मध्ये मदतीसाठी धुळे, पुण्याहून करावे लागते पथकास पाचारण

नांदेड : राज्य आपत्ती निवारण बलाची स्वतंत्र तुकडी मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यात नसल्याने पावसाळा वगळता इतर वेळी निर्माण झालेल्या आपत्ती काळात मदत पुरविण्यासाठी प्रशासनाला कसरत करावी लागते. गोल्डन अवरमध्ये मदत न मिळाल्याने अनेक जीव गमाविण्याचा धोका निर्माण होतो. तेव्हा राज्य आपत्ती निवारण बलाची स्वतंत्र तुकडी पूर्णवेळ कार्यरत ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

राष्ट्रीय आपत्ती निवारण बलाच्या (एनडीआरएफ) अंतर्गत राज्य आपत्ती निवारण बल कार्यरत असते. राज्यात कुठेही आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली तर एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या जवानांमार्फत तातडीने मदतकार्य केले जाते. त्यामुळे आपत्ती काळामध्ये अनेक जीव वाचू शकतात. संपूर्ण मराठवाडा विभागासाठी पावसाळ्यामध्ये एसडीआरएफची केवळ एक तुकडी नियुक्त केली जाते. आपत्ती केव्हाही सांगून येत नाही. त्यामुळे मराठवाड्यासाठी एसडीआरएफची स्वतंत्र पूर्णवेळ तुकडी नियुक्त करणे गरजेचे झाले आहे. दुसरीकडे विदर्भात नागपूर आणि धुळे या दोन ठिकाणी एसडीआरएफची स्वतंत्र तुकडी कार्यरत आहे; परंतु मराठवाड्यात आपत्ती निवारण बलाची तुकडी नसल्याने वेळेत मदत उपलब्ध होत नाही. परिणामी अनेक जीव गमवावे लागतात. तेव्हा मराठवाड्यासाठी एसडीआरएफची तुकडी पूर्णवेळ कार्यरत ठेवावी, अशी मागणी होत आहे.

राज्यात बारा ठिकाणी एसआरपीएफ केंद्रमुंबई, पुणे, दौंड, सोलापूर, जालना, अमरावती, नागपूर, हिंगोली, धुळे, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, कोल्हापूर या १२ ठिकाणी राज्य राखीव बलाचे प्रशिक्षण केंद्र आहे. त्यापैकी छत्रपती संभाजीनगर, गोंदिया आणि कोल्हापूर या ठिकाणी राखीव बलाच्या तीन तुकड्या ठेवल्या आहेत. राज्य राखीव पोलिस बलातील जवानांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण देऊन राज्य आपत्ती निवारण बलाची तुकडी कार्यरत केली जाते. विदर्भातील नागपूर आणि धुळे या ठिकाणी एसडीआरएफची तुकडी कार्यरत आहे. मराठवाड्यासाठीही छत्रपती संभाजीनगर, हिंगोली किंवा जालना येथे एसडीआरएफची पूर्णवेळ तुकडी कार्यरत करणे सोयीचे होऊ शकते.

मदतीसाठी लागतात ७ ते १० तासपावसाळा वगळता इतर काळात मराठवाड्यामध्ये आपत्ती परिस्थिती निर्माण झाली तर मदतकार्य मागविण्यासाठी किमान ८ ते १० तास लागतात. धुळे येथून एसडीआरएफची टीम दाखल होण्यासाठी ८ तास तर पुणे येथून एनडीआरएफची टीम दाखल होण्यासाठी किमान १० तास लागतात. आपत्ती काळात गोल्डन अवर असलेल्या पहिल्या एक तासात मदत मिळाली तर अनेक जीव वाचू शकतात.

एका तुकडीत ३५ जवानराज्य आपत्ती निवारण बलाच्या एका तुकडीमध्ये एक पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक, दोन चालक आणि ३० जवान अशा ३५ जणांचा समावेश असतो.

२८ जणांचे वाचविले होते जीवमागील वर्षी पावसाळ्यात मराठवाड्यासाठी नियुक्त केलेली एसडीआरएफची टीम नांदेड येथे मुक्कामी होती. या पथकातील जवानांनी मुदखेड, अर्धापूर, कासारखेडा, माहूर आदी ठिकाणी बचाव कार्य करून २८ जणांना पुरातून बाहेर काढले होते. त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात बोअरवेलमध्ये अडकलेल्या मुलाला बाहेर काढून त्याचा जीव वाचविण्याचे मोलाचे काम एसडीआरएफच्या जवानांनी केले होते.

टॅग्स :NandedनांदेडRainपाऊस