शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

अविस्मरणीय! ५० व्या एनिवर्सरीला बँड अन् वरात; वयोवृद्ध आईवडिलांचे मुलांनी लावले पुन्हा लग्न

By भारत दाढेल | Updated: May 29, 2024 16:05 IST

आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्या मुलांच्या डोळ्यात अंजन घालणारा अनोखा लग्न सोहळा; आईवडिलांची घोड्यावरून काढली वरात, बँडपथकावर नाचली वऱ्हाडी मंडळी

नांदेड : वयोवृद्ध आईवडिलांचा सांभाळ करण्याऐवजी त्यांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्या मुलांची संख्या वाढत असतानाच पंचाहत्तरीत पोहोचलेल्या आपल्या आईवडिलांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस रविवारी धूमधडाक्यात साजरा करणाऱ्या मुलांनी मात्र वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या वयात वयोवृद्ध आईवडिलांचे मुलांनी पुन्हा लग्न वाजतगाजत लावले.बिलोली तालुक्यातील गोगलेगाव येथील विठ्ठलराव बुद्धलवाड व राजाई बुद्धलवाड या दाम्पत्यांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय त्यांच्या मुलांनी घेतला. मग सुरू झाली लग्न सोहळ्याची तयारी.गावाला चूलबंद आमंत्रण

बँड पथक, मंडप डेकाेरेशन, गावाला चूलबंद आमंत्रण, सहाशे जणांना मूळ पत्रिका, ऑर्केस्ट्रा, वरातीसाठी घोडे अशी सगळी जय्यत तयारी करण्यात आली. अगदी नवरदेवासाठी शेरवानी, तर नवरीसाठी पैठणी खरेदी करण्यात आली. या लग्न सोहळ्यात जवळपास पंचाहत्तरी पोहोचलेल्या नवरी व नवरदेवाला हळद लावण्यापासून ते मंगलअष्टके म्हणण्यापर्यंत सगळे सोपस्कार पार पडण्यात आले.

नवरी, नवरदेवाची घोड्यावरून काढली वरातगावातून नवरी, नवरदेवाची घोड्यावरून वरात काढण्यात आली. बँडच्या तालावर वऱ्हाडी बेधुंद होऊन नाचत होते. विशेषत: विठ्ठलराव व राजाई यांची मुले-मुली वरातीत आनंदाने नाचत होते. लग्न मंडपात एकीकडे ऑर्केस्ट्रावर वेगवेगळी गाणी सादर केली जात होती. जशजशी लग्नाची वेळ जवळ येत होती, तसे नवरी, नवरदेव लग्न मंडपात घोड्यावरून पोहोचले.

लग्नसोहळ्याचे कुतहूल व भावनिक उमाळानटून थटून आलेले वऱ्हाडी मंडळी हातात अक्षता घेऊन थांबले होते. गाण्याच्या तालासुरावर नवरी, नवरदेव लाजत स्टेजवर पोहोचताच मंगल अष्टके सुरू झाली. अक्षतांची उधळण नवरी, नवरदेवावर केली जात होती. एकमेकांना पुष्पहार घातल्यानंतर सात फेरे व मणीमंगळसूत्र घालून लग्नाचा विधी पार पडला. यावेळी मंडपात टाळ्यांचा गजर व फटक्यांची आतषबाजी करण्यात आली. हा नेत्रदीपक सोहळा पार पडताना मात्र प्रत्येकाच्या मनात या आगळ्या वेगळ्या लग्नसोहळ्याबद्दल कुतूहल व भावनिक उमाळा दाटला होता.

जे सुख मिळाले नाही ते दिलेउतरत्या वयात आपल्या आईवडिलांना जे सुख मिळाले नाही, ते सुख देण्याचा प्रयत्न मुलांनी केला होता. आईवडिलांची सगळी हौस मुलांनी पूर्ण केली होती. पन्नास वर्षांपूर्वी गरिबीचे चटके सहन केलेल्या आईवडिलांना लग्नाच्या वेळी साधी सायकलवरून वरात काढता आली नव्हती. मात्र, आता मुलांनी घोड्यावरून वरात काढून आईवडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या. केवळ सोपस्कार न करता मुलांनी मोठ्या थाटात विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याची पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे.

मुलांना कर्तव्याची जाणीव व्हावीवयोवृद्ध आईवडिलांना मुलांच्या आधाराची गरज असते. पण अनेक मुले आपले कर्तव्यही विसरतात. या विवाह सोहळ्यातून इतर मुलांना आपल्या कर्तव्याची जाणीव व्हावी, हा उद्देश असल्याची प्रतिक्रिया बुद्धलवाड यांच्या मुलाने दिली.

टॅग्स :Nandedनांदेडmarriageलग्नFamilyपरिवार