शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

बंधाऱ्यात निम्माच साठा; नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांवर पाणीसंकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 15:58 IST

नदीकाठच्या गावांमधील पाण्याचे संकट कमी व्हावे, शेतीचे सिंचन वाढावे, या उद्देशाने गोदावरी नदीवर ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले.

नांदेड : गोदावरी आणि पैनगंगा नद्यांवर बांधलेल्या बंधाऱ्यांत सरासरी निम्माच पाणीसाठा झाला असून, नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील अनेक गावांवर पाणीसंकट ओढवण्याची भीती निर्माण झाली आहे.

नदीकाठच्या गावांमधील पाण्याचे संकट कमी व्हावे, शेतीचे सिंचन वाढावे, या उद्देशाने गोदावरी नदीवर पैठणपासून ते नांदेड जिल्ह्यापर्यंत ठिकठिकाणी बंधारे बांधण्यात आले. यावर्षी पाऊसकाळ कमी राहिला. काही जिल्ह्यांमध्ये सरासरीएवढाही पाऊस झाला नाही. प्रकल्प रिकामे असून, नदीतून पुढे पाणी सोडण्याची वेळ आलीच नाही. परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीवर पाच बंधारे असून, नांदेड जिल्ह्यात चार बंधारे आहेत. तर नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर पाच बंधारे आहेत.

सध्या गोदावरी नदीवरील परभणी जिल्ह्यातील बंधाऱ्यांमध्ये जेमतेम निम्मा पाणीसाठा आहे. तर नांदेड जिल्ह्यात गोदावरीवरील बंधाऱ्यांत बऱ्यापैकी साठा आहे. मात्र, पैनगंगा नदीवरील बंधारे चक्क कोरडेच आहेत. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईची चिंता आतापासूनच सतावत आहे. जायकवाडी प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडले तरच बंधाऱ्यात पाणीसाठा होणार आहे. उन्हाळ्यातील टंचाई दूर करण्यासाठी पुन्हा जायकवाडी प्रकल्पावर अवलंबून राहावे लागेल.

प्रकल्पांतील साठाही चिंतेचापरभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ६२ टक्के, सिद्धेश्वर प्रकल्पात ९९ टक्के, निम्न दुधना प्रकल्पात २७ टक्के, अपर मानार प्रकल्पात ३५ टक्के, निम्न मानार प्रकल्पात ७३ टक्के, इसापूर प्रकल्पात ८३ टक्के, तर नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा आहे. परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना आणि नांदेड जिल्ह्यातील अपर मानार प्रकल्पातील साठा चिंता वाढवीत आहे.

बंधाऱ्यातील साठा

ढालेगाव : ४८ टक्के

तारुगव्हाण : ५० टक्के

मुदगल : ४९ टक्के

मुळी : ० टक्के

डिग्रस : ७३ टक्के

अंतेश्वर : १०० टक्के

आमदुरा : ८० टक्के

बळेगाव : ८७ टक्के

बाभळी : शून्य टक्के

पैनगंगा नदीवरील बंधारेमंगरूळ : ०.४७ टक्केभंडारवाडी : ६.५० टक्केमोहपूर :०.३५ टक्केसाकूर : ०.३५ टक्केदिगडी : १.७२ टक्के

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणी