शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

नांदेड महापालिकेत प्लास्टिक बाटलीला बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 19:23 IST

महापालिका प्रशासनाने सर्व विभागांना  प्लास्टीक बाटल्या बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत़ 

ठळक मुद्देशासकीय कार्यालयांना सूचना मिळाल्या

नांदेड : पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळण्यासाठी शासनाने प्लास्टिक बंदी केली आहे़ त्यातच प्लास्टिकजन्य कचरा होऊ नये म्हणून शासकीय कार्यालय आणि शासनाकडून घेण्यात येणाऱ्या कार्यक्रम, बैठकांमध्ये आता प्लास्टिकच्या पाणी बाटल्या वापरू नये, असे आदेश राज्य शासनाने दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने सर्व विभागांना प्लास्टीक बाटल्या बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत़ 

नांदेड वाघाळा महापालिका प्रशासनाने आदेश काढून १ मार्चपासून कार्यालयात प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा वापर करू नये, असे निर्देश दिले आहेत़ कोणत्याही कार्यालयात अथवा बैठकीत प्लास्टिकची पाणी बॉटलचा वापर करताना निदर्शनास आल्यास सदरील कार्यालयप्रमुखांविरुद्ध महाराष्ट्र अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम २००६ मधील तरतुदीत नमूद केल्यानुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ पिण्याच्या पाण्याच्या पीईटी किंवा पीईटीई बाटल्यांवर राज्य शासनाने बंदी घातली आहे़ त्यामुळे अशा पाण्याच्या बाटल्यांचा वापर कार्यालयातील विविध बैठकीत, कार्यक्रमांत तसेच दैनंदिन काम करत असताना कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी करू नये, असेही म्हटले आहे़ प्लॅस्टिकजन्य वस्तूंचा वापर न करणे व त्यातून होत असलेल्या प्लॅस्टिकजन्य कचरा निर्मितीवर आळा घालण्यासाठी हा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे़ सदर आदेशाची नांदेड शहर व परिसरात कठोर अंमलबजावणी करण्यासाठी शासकीय, निमशासकीय, महामंडळे, इतर संस्था व कार्यालयांनी  कार्यालयात पिण्याच्या पाण्यासाठी प्लॉस्टिकच्या बाटल्यांचा वापर करु नये़ कार्यालयात पाणी पिण्यासाठी कागदी, स्टील अथवा स्टिलचे ग्लास ठेवण्याची व्यवस्था करावी, अशा सूचना महानगरपालिका प्रशासनाने संबंधीत कार्यालयाच्या प्रमुखांना एका पत्रकाद्वारे दिल्या आहेत़ 

पर्यायी साधनांचा वापर अन् उपलब्धता गरजेचीच्निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टिक बॉटलला हद्दपार करणे गरजेचे आहे़ त्याअनुषंगाने शासनाने घेतलेल्या निर्णयाचे नागरिकांसह प्रशासनात काम करणाऱ्या प्रत्येकांने स्वयंस्फुर्तपणे स्वागत केले पाहिजे़  एकवेळ वापरून फेकून दिल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बॉटल वापरणे स्वत: पासून बंद करणे गरजेचे आहे़ शासकीय कार्यालयात शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे़ तसेच पाणी पिण्यासाठी काच, स्टीलचा स्वच्छ ग्लास उपलब्ध करून द्यावेत, बाहेरून येणाऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करणेही गरजेचे आहे़

- डॉ़पुष्पा गायकवाड, पर्यावरण अभ्यासक़ 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीNandedनांदेडNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका