शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
3
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
4
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
5
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
6
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
7
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
8
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
9
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
10
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
11
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
12
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
13
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
14
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
15
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
16
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
17
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
18
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
19
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
20
मायेची फुंकर! ब्रेकअप-स्ट्रेस- रागावर नियंत्रण यासाठी थेरपी देणारी उशी,अनेक दुखण्यांवर औषध

चोरांची तऱ्हाच न्यारी! पॉश गाडी, फ्लॅट अन् विमानाने प्रवास; राजस्थानची टोळी, महाराष्ट्रात सहा चोऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 13:19 IST

एकाच दणक्यात पाच-सात चोऱ्या केल्या की विमानाने आपल्या राज्यात निघून जायचे. चोरीची ही अजब तऱ्हा आहे राजस्थानातल्या ‘फौजी टोळी’ची...

नांदेड : मोठ्या शहरातील पॉश वस्त्या गुगलवरून सर्च करायच्या, तेथे पॉश इमारतीत फ्लॅट भाड्याने घेऊन काही दिवस राहायचे, महागड्या गाड्या चोरून त्याच गाड्यांनी फिरायचे, घरांची रेकी करायची, घरावर खूण करायची आणि संधी मिळताच हात मारायचा. त्यानंतर पुन्हा दुसऱ्या मोठ्या शहरात शिफ्ट व्हायचे. एकाच दणक्यात पाच-सात चोऱ्या केल्या की विमानाने आपल्या राज्यात निघून जायचे. चोरीची ही अजब तऱ्हा आहे राजस्थानातल्या ‘फौजी टोळी’ची...

सर्वात आधी नागपुरात मारला हातसतपाल सिंह ऊर्फ सतपाल फौजी (४३, रा. गुरुग्राम, हरयाणा) हा या टोळीचा ‘म्होरक्या’ असून विकास ऊर्फ पवन शर्मा (रा. राजस्थान), विक्रमजित रामचंद्र व जितेंद्र ऊर्फ जॉनी मुरारीलाल सोनी (रा. हरयाणा) हे सदस्य आहेत. या टोळीने महाराष्ट्रात सर्वप्रथम नागपूरला, त्यानंतर सोलापूर, कर्नाटकातील बिदर, लातूर, छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर येथे चोरी केली. त्यानंतर सतपाल सिंह हा हैदराबाद येथून विमानाने घरी लग्न असल्याने दिल्लीला गेला. 

राजस्थानात आवळल्या टोळीच्या मुसक्या या टोळीने लातूरमधील बिसेननगर येथील सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक योगिराज फड यांच्या घरी तब्बल १९ लाखांच्या दागिन्यांची चोरी केली. 

यातील आरोपी राजस्थानला पळून गेले असता १८ मे रोजी अजमेरनजीकच्या किशनगंज पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. लातूर पोलिसांनी राजस्थानमधील उदयपूर कारागृहातून सतपाल सिंह व विकास शर्मा या आरोपींना ताब्यात घेतले. त्यांनी महाराष्ट्रातील सहा चोऱ्यांची कबुली दिली...........

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसThiefचोर